Bacchu Kadu : “भाजपने वापरुन घेण्याची भाषा करू नये, नाहीतर गेम करू”, कडूंनी आवाज वाढवला

मुंबई तक

MLA Bacchu Kadu: आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या मतदारसंघानुसार सध्या भाजपचे मेळावे सुरु आहेत. त्याच धर्तीवर अमरावतीतही भाजपची (BJP Meeting) बैठक आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेला (Prahar Sanghtna) निमंत्रणही मिळाले आहे. मात्र प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी मात्र भाजपच्या या बैठकीकडे जाणार नसल्याचे सांगत आमची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले आहे. आम्ही […]

ADVERTISEMENT

Absence of Prahar Sangathan MLA Bachu Kadu at BJP meeting position should be clarified regarding assembly
Absence of Prahar Sangathan MLA Bachu Kadu at BJP meeting position should be clarified regarding assembly
social share
google news

MLA Bacchu Kadu: आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या मतदारसंघानुसार सध्या भाजपचे मेळावे सुरु आहेत. त्याच धर्तीवर अमरावतीतही भाजपची (BJP Meeting) बैठक आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेला (Prahar Sanghtna) निमंत्रणही मिळाले आहे. मात्र प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी मात्र भाजपच्या या बैठकीकडे जाणार नसल्याचे सांगत आमची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले आहे.

आम्ही नाही जाणार…

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधत सांगितले की, ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि जिल्ह्यात संघटना असूनही कोणत्या समितीवर आमचे सदस्य घेतले गेले नाहीत. त्यामुळे या बैठकीला मी जाणार नसून आमचा प्रतिनिधी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात, तब्बल 4 वर्ष शिक्षिकेवर बलात्कार

निधी का नाही

आमदार बच्चू कडू यांनी यावेळी भाजपच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, सध्या दोन नगरपंचायतीवर प्रहारची सत्ता आहे. मात्र त्या एकाही नगरपंचायतीला आणि सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींनाही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे आता आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमचा सदस्य कुठेच नाही

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटना आहे. मात्र कोणत्याही जिल्हा नियोजन समितीवर आणि संजय गांधी निराधार योजनेवरही आमचे सदस्य घेतले गेले नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसात असे निर्णय घ्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, भाजपने आता विधानसभेबाबत काय निर्णय घेणार याबाबत स्पष्टपणे सांगितले पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp