“55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : सीतारामन यांच्या दौऱ्यावर पवारांचे भाष्य
बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सीतारामन यांच्या बहुचर्चित बारामती दौऱ्यावर सध्य राज्यभरात चर्चा सुरु आहेत. दरम्यान सीतारमन यांच्या याच दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. “55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : अजित पवार बारामतीत कोणीही येऊ द्या, त्यांचे आम्ही स्वागतच करु. गेली 55 वर्ष झालं आम्ही बघत आहोत, […]
ADVERTISEMENT

बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सीतारामन यांच्या बहुचर्चित बारामती दौऱ्यावर सध्य राज्यभरात चर्चा सुरु आहेत. दरम्यान सीतारमन यांच्या याच दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
“55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : अजित पवार
बारामतीत कोणीही येऊ द्या, त्यांचे आम्ही स्वागतच करु. गेली 55 वर्ष झालं आम्ही बघत आहोत, अनेक जण येतात, भेटतात, जातात. पंतप्रधान बारामतीत आले, आम्ही त्यांचेही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चंद्रशेखर बावनकुळे आले तरी त्यांचेही स्वागतच आहे. बारामतीत कोणीही यावे, बारामतीकरांना भेटावे. मात्र बारामतीकर त्यांना जे हवे आहे तेच करतात, असेही पवार म्हणाले.
काँग्रेसचे सात आमदार भाजपच्या संपर्कात? देवेंद्र फडणवीस-अशोक चव्हाणांची मुंबईत भेट
राजु शेट्टींवरही पवारांचा निशाणा :
काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले होते. काहींना केवळ टेंडर काढण्यातच रस असतो. शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत, असा आरोप शेट्टी यांनी केला होता. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले.