संजय राठोड पुन्हा अडचणीत? एकनाथ शिंदेंना दिलेल्या पत्रात गंभीर आरोप

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Corruption allegations against Ekanth Shinde's minister sanjay Rathod by chemist association
Corruption allegations against Ekanth Shinde's minister sanjay Rathod by chemist association
social share
google news

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर जावं लागलेले संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. यावेळी अडचणीत येण्याचे कारण म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं असून, त्यात राठोडांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एमएससीडीए अर्थात द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने टाकलेल्या लेटरबॉम्बने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री पद गमवावं लागलेल्या संजय राठोडांवर यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.

हेही वाचा >> या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला होता संजय राठोडांचा राजीनामा

द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात ‘मंत्रालय नसून, भ्रष्टालय’ असा उल्लेख करत म्हटलं आहे की, “राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्र्यांचं कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून, भ्रष्टालय असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील औषध विक्रेते मंत्र्यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त झाले आहेत.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संजय राठोड यांच्यावर काय आरोप करण्यात आलेत?

पत्रात म्हटलं आहे की, “राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानाच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे त्यांचे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरिता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करणे, अशी कारवाई केली जाते.”

हेही वाचा >> जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला चेंगराचेंगरीचा व्हिडीओ, म्हणाले…

“अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक वेळा छोट्या छोट्या त्रुटीसाठी औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा केली जाते. औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात मंत्र्यांकडे अपिल करण्याची तरतूद असल्याने औषध विक्रेते अपिल दाखल करतात. सदरहू अपिलावर स्थगनादेश देणे अथवा सुनावणी लावून निर्णय देणे अपेक्षित असते.”

ADVERTISEMENT

अनेकवेळा शिक्षेचा पूर्ण कार्यकाळ संपून गेला तरीही मंत्र्यांच्या कार्यालयाकडून अनेक वेळा संपर्क साधून सुद्धा निर्णय दिला जात नाही. यामुळे सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागते”, असं या पत्रात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

संजय राठोडांच्या पीएस, ओएसडीकडून पैशांची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात असा आरोप करण्यात आला आहे की, “औषध विक्रेत्यांना मंत्र्याचे पीएस डॉ. विशाल राठोड, ओएसडी संपत डावखर, तसेच चेतन करोडीदेव यांच्याकडून प्रचंड पैशांची मागणी केली जात आहे. याबाबत संघटनेने यापूर्वीही आपणास, उपमुख्यमंत्र्यांना तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना भेटून सूचित केलं. त्यानंतरही भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढलेला असल्याच्या तक्रारी राज्य संघटनेकडे वारंवार तोंडी स्वरूपात प्राप्त होत आहेत.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘एमएससीडीए’चा इशारा

पत्रात पुढे म्हटलं आहे की, “राज्य सरकारने सदरहू बाब गांभीर्याने न घेतल्यास राज्य संघटनेस याविरोधात आंदोलन उभे करावे लागले व प्रसंगी बंदही पुकारांवा लागेल. त्यामुळे होणाऱ्या परिणामास सरकार व प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी”, असा इशाराही केमिट्स् असोसिएशनकडून देण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT