Assembly Election 2023 : बालमुकुंद ते ओतराम… भाजपच्या चार महंतांचं काय झालं?

भागवत हिरेकर

Who will be Chief Minister of Rajasthan : राजस्थानमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. ११५ जागा जिंकत भाजपने काँग्रेसला लोळवलं. यात चार महंतांचे निकालही समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

Balaknath, Balmukund, Pratap Puri and Otram... BJP had also fielded four saints and all of them have registered a resounding victory.
Balaknath, Balmukund, Pratap Puri and Otram... BJP had also fielded four saints and all of them have registered a resounding victory.
social share
google news

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या सर्व 199 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी भारतीय जनता पक्षाने 115 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने चार महंतांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे चौघांच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष होते. महत्त्वाचे म्हणजे चौघांना उमेदवारी देऊन भाजपने हिंदुत्व केंद्रीत तयार केलेली रणनीती निवडणुकीत पूर्णपणे प्रभावी ठरली. कारण चारही महंत या निवडणुकीत विजयी झाले. पण, त्यांनी कुणाचा आणि किती मतांनी पराभव केला?

जाणून घेऊया त्या चार महंतांबद्दल ज्यांना भाजपने दिली होती उमेदवारी

बाबा बालकनाथ (तिजारा)

बाबा बालकनाथ हे अलवरचे खासदारही आहेत. बालकनाथ यांची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जाते आणि त्यांना ‘राजस्थानचे योगी’ देखील म्हटले जाते. तिजारा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या इम्रान खान यांचा 6173 मतांनी पराभव केला. बालकनाथ यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अलवरमधून काँग्रेसच्या भंवर जितेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. बालकनाथ हे भाजपचे फायर ब्रँड नेते मानले जातात. यूपीचे मुख्यमंत्री योगी यांनीही त्यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली होती. त्यांची ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणूनही चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे तिजारा ही जागा चर्चेत आली.

हेही वाचा >> गेहलोतांच्या भूमीत मोदींची ‘जादू’, भाजपने कसा बदलला ‘गेम’?

39 वर्षीय बालकनाथ यांच्याकडे भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यात बसणारे मुख्यमंत्री दावेदार म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी भाजपने राजस्थानमध्ये आपल्या कार्यकारिणीची घोषणा केली तेव्हा त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले. बालकनाथ हे नाथ संप्रदायाचे सर्वात मोठे स्थान असलेल्या बोहर मठाचे महंत आहेत, ज्यांचा प्रभाव केवळ राजस्थानमध्येच नाही तर हरियाणामध्येही आहे आणि रोहतकमध्ये या मठाची अनेक विद्यापीठे, महाविद्यालये, रुग्णालये, शाळा आहेत.

हवामहल ते बालमुकुंदाचार्य

जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे बालमुकुंदाचार्य यांनी काँग्रेसचे उमेदवार आरआर तिवारी यांचा 974 मतांनी पराभव केला. बालमुकुंदाचार्य यांना 95989 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला 95015 मते मिळाली. हातोज धामचे संत बालमुकुंदाचार्य उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता त्यांनी हातात हनुमानाची गदा धरली होती आणि त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. बालमुकुंदाचार्य हे अखिल भारतीय संत समाज राजस्थानचे प्रमुख आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp