Politics News in Marathi : भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

What is bjp new strategy for lok sabha election 2024? positive signs from old NDA colleagues
What is bjp new strategy for lok sabha election 2024? positive signs from old NDA colleagues
social share
google news

latest news on BJP party : लोकसभा निवडणुकीला वर्षभराहून कमी काळ शिल्लक असला, तरी बेरजेच्या राजकारणाला वेग आला आहे. राजकीय समीकरणे आणि विविध पक्षाशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसत आहे. देशात सलग तिसर्‍यांदा भाजपची सत्ता येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष परस्पर ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी दुसरीकडे, 2024 मध्ये विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी एनडीएशी संबंध तोडलेल्या मित्रपक्षांना पुन्हा सोबत घेण्यासाठी भाजपने (BJP political news) काम सुरू केले आहे. चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीपासून ते ओमप्रकाश राजभर यांच्या सुभासपापर्यंत, अनेकांची एनडीएमध्ये (BJP politics in india) घरवापसी करून घेण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

टीडीपी-भाजपसोबत पुन्हा युती!

TDP अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि टीडीपीच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप आणि टीडीपी केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे तर तेलंगणा विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकाही युतीत लढणार आहेत.

हेही वाचा >> भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून ठिणगी, शिंदेंच्या मंत्र्यांने दिला इशारा!

2024 मध्ये लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर तेलंगणात या वर्षी निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत टीडीपीसोबत आघाडी करून दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका लढविण्याचे मान्य करण्यात आले असून, लवकरच दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी मोठ्या भावाची तर तेलंगणात टीडीपी भाजपच्या लहान भावाची भूमिका बजावणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2018 मध्ये तुटली होती टीडीपी-भाजप युती

खरेतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे 2018 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून टीडीपीने एनडीएपासून फारकत घेतली होती. भाजप-टीडीपी युती तुटल्याने आंध्र प्रदेश विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचे नुकसान झाले होते. टीडीपीला विधानसभा निवडणुकीत 23 जागा आणि लोकसभेत तीन जागा मिळाल्या, तर भाजपला खातेही उघडता आले नव्हते. तेलंगणातही राजकीय भवितव्य असेच होते. येथे भाजपचा एक आमदार आणि टीडीपीचे दोन आमदार निवडून आले होते.

हेही वाचा >> विनोद तावडे म्हणाले भाजपमध्ये परत या, एकनाथ खडसेंनी केलं मोठं विधान

भाजप आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष सगळं गमावल्यानंतर पुन्हा एकत्र येताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून दोघांमधील जवळीक वाढू लागली. त्याच वर्षी, दोन्ही पक्षांनी पोर्ट ब्लेअर नगरपरिषदेची निवडणूक एकत्र लढवली आणि एस. सेल्वी यांना अध्यक्षपद म्हणून जिंकून आणण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात ‘मन की बात’ कार्यक्रमात एनटी रामाराव यांच्या जयंतीनिमित्त टीडीपीशी मैत्रीचे संकेतही दिले होते.

ADVERTISEMENT

जनसेनेला सोबत आणण्याची कसरत

भाजपचा पुढचा प्रयत्न जनसेनेला सोबत ठेवण्याचा आहे. मात्र, भाजप आणि टीडीपीच्या वाढत्या जवळकीमुळे जनसेना नाराज आहे. आंध्र प्रदेशात तिन्ही पक्षांनी वायएसआर काँग्रेसविरुद्ध एकत्र लढावे आणि त्याचवेळी तेलंगणात जनसेनेने भाजपला मदत करावी, अशी भाजपची इच्छा आहे. दुसरीकडे, टीडीपीसोबत करार झाल्यानंतर भाजपचा पुढील प्रयत्न जनसेनेसोबत युती करण्याचा आहे. आंध्र प्रदेशात जनसेनेचा स्वतःचा राजकीय पाया आहे, ज्याचा फायदा भाजप करुन घेण्याच्या विचारात आहे.

ADVERTISEMENT

युपीमध्ये राजभर यांच्याशी मैत्री

लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम पत्करायची नाही, त्यासाठी विद्यमान मित्रपक्षांना एकत्र ठेवण्यासोबतच ते नवीन मित्रपक्षांच्याही शोधात आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये ओमप्रकाश राजभर यांच्या सुभासपासोबत युती करण्यावर भाजपचा जोर आहे. राजभर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान करून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. त्याचे कारण म्हणजे सुभासपासोबत युती केल्यास भाजपला पूर्वांचलमध्ये लोकसभेच्या पाच ते सहा जागा मिळू शकतात.

समजून घ्या >> Ajit Pawar – Udhhav Thackeray यांना BMC मध्ये एकत्र लढण्याचा किती फायदा?

ओमप्रकाश राजभर यांना एनडीएमध्ये परत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुभासपाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची भाजप नेतृत्वासोबत जुलैमध्ये बैठक प्रस्तावित असल्याचे समजते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाजप नेतृत्वाला उत्तर प्रदेशमधील लढत अत्यंत चुरशीची असणार असल्याचे संकेत दिले जात आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. अशा स्थितीत भाजपला आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘करा किंवा मरा’ या तत्त्वावर पूर्ण ताकद लावावी लागणार आहे.

बिहारमध्ये भाजपशी चार पक्षांची जवळीक

बिहारमध्ये नितीश कुमार एनडीए सोडून महाआघाडीत सामील झाल्यानंतर भाजप नवीन राजकीय मित्रपक्षांच्या शोधात आहे. रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा सांभाळणारे चिराग पासवान भाजपशी जवळीक साधत आहेत. पोटनिवडणुकीत भाजपचा प्रचार करून चिराग यांनी आपले इरादा स्पष्ट केले आहेत. मात्र, काका पशुपती पारस एनडीएमध्ये असल्याने ही मैत्री जुळताना दिसत नाहीये. मात्र, काका-पुतण्या दोघांनाही सोबत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

जेडीयूपासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन करणारे उपेंद्र कुशवाह हेही भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांनाही सोबत घेण्याच्या तयारीत आहेत. हे दोन्ही नेते यापूर्वी एनडीएसोबत होते. त्याचवेळी महाआघाडीचा भाग असलेले जीतन राम मांझी हे देखील सध्या बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे तेही एनडीएमध्ये येण्यार असल्याचे म्हटले जात आहे. 2014 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने बिहारमध्ये छोट्या पक्षांच्या मदतीने प्रयत्न करून बघितला होता. आता त्याच फॉर्म्युलावर काम करताना भाजप दिसत आहे.

अकाली दल पंजाबमध्ये करणार पुनरागमन?

शेतकरी आंदोलनादरम्यान शिरोमणी अकाली दलाने भाजपसोबतची युती तोडली. याचा राजकीय फटका भाजप आणि अकाली दल या दोघांनाही सहन करावा लागला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ज्या प्रकारे आपल्या जुन्या मित्रपक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे अकाली दलही एनडीएमध्ये परतण्याची अपेक्षा आहे. याचे कारण पंजाबमधील दोन्ही पक्षांसमोर आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. प्रकाश सिंह बादल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पोहोचले होते, त्यामुळे हे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT