अमित शाह यांची विरोधकांना विनंती, राहुल गांधी थेट आरोप करत काय बोलून गेले?

मुंबई तक

संसदेच्या लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांना दुपारी 3 पासून सलग 24 तास कोणत्याही मुद्द्यावर खुली चर्चा करण्याचे जे आव्हान दिले होते, त्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत अमित शाह यांच्या ऑफरची अक्षरशः हवा काढून घेतली आहे.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi On Amit Shah
Rahul Gandhi On Amit Shah
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अमित शाह यांची विरोधकांना विनंती

point

राहुल गांधी थेट आरोप करत काय बोलून गेले?

Rahul Gandhi On Amit Shah : संसदेतील चर्चेच्या मुद्दयावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटला आहे. संसदेत उपस्थित राहून चर्चा करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना अमित शाह यांनी, सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास पूर्णपणे तयार असून विरोधी पक्षाने प्रथम आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. शाह यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, संसदेतील गदारोळ आणि विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृहाचे कामकाज सातत्याने बाधित होत आहे.

राहुल गांधी आक्रमक

अमित शाह यांच्या या वक्तव्यावर पलटवार करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, अमित शाह यांचे काल्पनिक स्पष्टीकरण किंवा भाषण ऐकण्यात विरोधकांना अथवा देशातील तरुण पिढीला अजिबात रस नाही. देशभरातील विद्यार्थ्यांना सध्या एकाच मुख्य प्रश्नाचे उत्तर हवे आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ला आणि गोळीबाराच्या आदेशावरून थेट गृह मंत्रालयावर आणि अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले.

हे ही वाचा : सिब्बलांचे पाच महत्त्वाचे मुद्दे ठाकरेंना जिंकून देणार? राऊतांनी नेमकं काय सांगितलं?

त्यांनी पद सोडावे

आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा पाढा वाचताना राहुल गांधी यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. "विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आणि गोळीबार करण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले असतील तर ते या गुन्ह्यात दोषी आहेत आणि त्यांनी लगेच राजीनामा द्यावा. जर हे आदेश त्यांनी दिले नसतील, तर आपल्याच खात्यावर नियंत्रण नसल्यामुळे ते अकार्यक्षम ठरतात आणि तरीही त्यांनी पद सोडले पाहिजे," असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. तसेच शाह यांच्या सुरक्षेवर आणि गायब असण्यावर टीका करत त्यांनी गृहमंत्र्यांचे धैर्य संपल्याचा दावा केला.

हे ही वाचा : 'अल निनो'नंतर आता या Typhoon Dolphin चं टेन्शन, पाऊस थांबणार की धो-धो कोसळणार?

मीडिया सत्ताधाऱ्यांसमोर शांत

या वेळी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत, मीडिया केवळ विरोधकांनाच अवाजवी प्रश्न विचारतो आणि सत्ताधाऱ्यांच्या समोर शांत राहतो असा आरोप केला. झारखंडमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, आपण कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नसून विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात नेहमीच उघडपणे बोलत आलो आहोत. या संपूर्ण राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे संसद आणि देशातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.