मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी केलेलं शेवटचं भाषण जसंच्या तसं..
महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड पुकारलं होतं तेव्हाच मोठी उलथापालथ झाली होती. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला यात काही शंकाच नाही. या भूकंपाचं केंद्र सुरूवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीमध्ये गेलं. आठ दिवस आरोप-प्रत्यारोप, डाव प्रतिडाव चालले ते शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदार यांच्यात. भाजप या सगळ्यात कुठेही नव्हते. मंगळवारी देवेंद्र फडणवीस दिल्लीला […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड पुकारलं होतं तेव्हाच मोठी उलथापालथ झाली होती. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला यात काही शंकाच नाही. या भूकंपाचं केंद्र सुरूवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीमध्ये गेलं. आठ दिवस आरोप-प्रत्यारोप, डाव प्रतिडाव चालले ते शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदार यांच्यात. भाजप या सगळ्यात कुठेही नव्हते. मंगळवारी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यानंतर जेव्हा ते मुंबईत परतले तेव्हा त्यानी राज्यपालांची भेट घेतली.
Uddhav Thackeray: “मी आज सगळ्या महाराष्ट्राच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतो आहे”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर झालं आहे. बहुमत सिद्ध करायला सांगा या आशयाचं पत्र राज्यपालांना दिलं. त्यानंतर राज्यपालांनी ३० जूनला फ्लोअर टेस्ट ठेवली होती. या फ्लोअर टेस्टला स्थगिती द्यावी अशी मागणी करत सुप्रीम कोर्टात शिवसेना गेली होती. मात्र शिवसेनेची याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने ३० जूनलाच फ्लोअर टेस्ट घ्यावी हाच निर्णय दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि राजीनामा देत आहे हे जाहीर केलं. वाचा उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण जसंच्या तसं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर दोनदा राजीनामा देणार होते पण पवारांनी थांबवलं