Rahul Gandhi : नोटीस आली, खासदारकीवर टांगती तलवार; राहुल गांधी म्हणाले…
Congress leader Rahul Gandhi’s speech : नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्यातील संबंधांवर लोकसभेत (Loksabha) केलेल्या भाषणाबाबत देशभर चर्चा झाली. याच भाषणानंतर राहुल गांधी (Rahul gandhi) यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस देण्यात आली आहे. “पण मी संसदेत काहीही चुकीचे बोललेले नाही, लोकं […]
ADVERTISEMENT
Congress leader Rahul Gandhi’s speech :
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्यातील संबंधांवर लोकसभेत (Loksabha) केलेल्या भाषणाबाबत देशभर चर्चा झाली. याच भाषणानंतर राहुल गांधी (Rahul gandhi) यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस देण्यात आली आहे. “पण मी संसदेत काहीही चुकीचे बोललेले नाही, लोकं हवे असल्यास गुगलही करू शकतात”, असं म्हणतं त्यांनी या नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे. (Congress leader Rahul Gandhi’s speech in the Lok Sabha on the relationship between Prime Minister Narendra Modi and businessman Gautam Adani)
राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदाणी यांच्यातील संबंधांवर मी सभागृहात भाषण केलं होतं. मी माझा मुद्दा अतिशय शांत आणि नम्रपणे मांडला, कोणतीही वाईट भाषा वापरली नाही. माझ्या बाजूनं काही तथ्य मांडली. अदाणी पंतप्रधानांसोबत परदेश दौऱ्यावर कसे जायचे आणि नंतर त्यांना मोठे कंत्राट मिळत असे, विमानतळावरील ३० टक्के वाहतूक अदाणीद्वारे कशी नियंत्रित केली जाते, हे मी म्हटलं होतं. पण अदाणी आणि अंबानी यांच्याबद्दल बोलणे हा पंतप्रधानांचा अपमान आहे असं सध्या दिसतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!
सभागृहातील एखाद्याचं भाषण तथ्य नसलेलं असेल तरच काढून टाकलं जातं. मात्र मी केलेली सर्व विधानं वस्तुस्थितीच्या आधारेच दिली होती, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आपल्याबद्दल खूप बोलले, पण ते असंसदीय वक्तव्य मानलं गेलं नाही. माझं आडनाव गांधी का आहे नेहरू का नाही? असा सवाल त्यांनी विचारला. म्हणजे ते अपमान करू शकतात, पण त्यांचे शब्द काढले जात नाहीत. याचा अर्थ सत्य बाहेर येणार नाही असं नाही. भाषणादरम्यान माझा आणि पंतप्रधान मोदींचा चेहरा पाहिला का? किती वेळा पाणी प्यायले, हात कसे थरथरत होते. त्यांना वाटतं की ते शक्तिशाली आहेत आणि लोक त्यांना घाबरतील, असाही टोला त्यांनी हाणला.
ADVERTISEMENT
Shiv Sena फुटीमागे आप्पासाहेब धर्माधिकारी? ‘महाराष्ट्र भूषणला’ विरोध
ADVERTISEMENT
दरम्यान, निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली आहे. तसंच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून म्हटलं होतं की, नियम 380 नुसार, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही असंसदीय, अप्रतिष्ठा करणारे आरोप सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावेत. राहुल गांधी यांच्या भाषणातील हे मुद्दे काढूनही टाकण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांना नोटीस बजावली गेली आहे.
ADVERTISEMENT