एकनाथ शिंदे गटाचा ठराव; ठाकरे सरकारवरती गंभीर आरोप, ‘त्या’ पत्रात नेमकं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरुन हटवून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने एक ठराव पास केला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंनी विधानसभेचे उपअध्यक्ष नरहरी झीरवाळ यांनी ३४ आमदारांच्या सह्यांनी एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी महाविकास आघाडीतील भ्रष्टाचारावर देखील प्रकाश टाकला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा आमच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचा उल्लेख पत्रामध्ये केला आहे.

शिंदेंनी पास केलेल्या ठरावात नेमकं काय?

* एकनाथ शिंदेंना ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधींमंडळ गटनेता म्हणून निवडले गेले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

* २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेचे युती झाली परंतु सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन करण्यात आले.

* बाळासाहेबांच्या विचारांना बाजूला ठेवत महाविकास आघाडी करण्यात आली. त्याचा आम्हाला वैयक्तीक पातळीवर त्रास सहन करावा लागत आहे.

ADVERTISEMENT

* अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यामुळे सरकारवर होणाऱ्या आरोपांमुळे शिवसेना आमदरांमध्ये नाराजी आहे.

ADVERTISEMENT

* देशमुख-मलिकांवरील आरोपांमुळे सरकारची कोंडी झाली आहे.

* वेगळ्या विचारधारा सोबत आल्याने बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासला आहे.

* शिवसेनेची विचारधारा मराठी माणसांसाठी आहे, त्यात आम्हाला गेली अडीच वर्ष झालं तडजोड करावी लागत आहे.

* सत्तेसाठी पक्षाची विचारधारा बाजूला ठेवली जात आहे. हिंदूत्वाची भूमिका असलेल्या बाळासाहेबांना स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार पाहिजे होते.

बैठकीला उपस्थित राहण्याबाबत शिवसेनेनं आमदारांसाठी व्हीप जारी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिलीये. “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत,” असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT