भारतातील ‘या’ चार उपराष्ट्रपतींची अशी झाली होती बिनविरोध निवड!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार असल्याने, 16 व्या उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. 16 व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी, इलेक्टोरल कॉलेजमध्ये 233 निवडून आलेले सदस्य आणि राज्यसभेचे 12 नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे 543 निवडून आलेले सदस्य भाग घेत असतात. इलेक्टोरल कॉलेजमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे एकूण 788 सदस्य असतात.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर यांनी 18 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी मंगळवारी, 19 जुलै रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्षही असतात. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयी इतिहासात डोकावले असता चार उपराष्ट्रपतींची निवड बिनविरोध झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पहिली उपराष्ट्रपती निवडणूक – 1952

पहिल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शेख खादीर हुसेन या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर, रिटर्निंग ऑफिसरने शेख खादीर हुसेन यांचा अर्ज फेटाळला. एकमेव उमेदवार असल्याने, डॉ. राधाकृष्णन यांना 25 एप्रिल 1952 रोजी उपराष्ट्रपती पदावर बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले.

तेव्हाचे मद्रास आणि आताच्या चेन्नईचे रहिवासी असलेले डॉ. राधाकृष्णन, त्यांनी 13 मे 1952 रोजी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी एकूण मतदारांची संख्या 715 होती.

ADVERTISEMENT

दुसरी उपराष्ट्रपती निवडणूक – 1957

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची 23 एप्रिल 1957 रोजी दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ 12 मे 1957 रोजी संपणार होता आणि त्यांनी 13 मे रोजी लगेच दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती पद स्वीकारले. डॉ. राधाकृष्णन हे एकमेव वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार होते. 1957 मध्ये एकूण मतदारांची संख्या 735 होती.

ADVERTISEMENT

सातवी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक – 1979

1979 च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोहम्मद हिदयातुल्ला यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. विविध राजकीय पक्षांमधील एकमतामुळे त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांनी 31 ऑगस्ट 1979 रोजी उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारली. फेब्रुवारी 1968 ते डिसेंबर 1970 पर्यंत ते भारताचे मुख्य न्यायाधीश होते. याशिवाय, मोहम्मद हिदयातुल्ला यांनी भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम केले होते.

नववी उपराष्ट्रपती निवडणूक – 1987

1987 च्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. रिटर्निंग ऑफिसरने नामनिर्देशनपत्रांची छाननी केली असता केवळ डॉ.शंकरदयाल शर्मा यांनीच वैध अर्ज दाखल केल्याचे आढळून आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर डॉ.शंकरदयाल शर्मा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

डॉ. शर्मा यांनी 3 सप्टेंबर 1987 रोजी उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. 1987 मध्ये एकूण मतदारांची संख्या 790 होती. डॉ. शंकर दयाळ शर्मा, मध्य प्रदेशचे मूळ रहिवासी होते, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र, पंजाब आणि आंध्र प्रदेशच्या राज्यपाल म्हणून काम केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT