देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं का?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

ऋत्विक भालेकर

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाटलं. तेव्हा नेमकं काय झालं? दोन तासात सगळा निर्णय वेगळा कसा झाला? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘आज तक’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय? देवेंद्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाटलं. तेव्हा नेमकं काय झालं? दोन तासात सगळा निर्णय वेगळा कसा झाला? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘आज तक’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय?

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं का? नाही मला असं वाटलं नव्हतं कारण त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि मी सरकारच्या बाहेर राहिन. मात्र आमची सगळ्यांची इच्छा होती की ते मंत्रिमंडळात असावेत. देवेंद्र फडणवीस आमच्या मंत्रिमंडळात असतील तर विकास आणखी वेगाने होईल. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना म्हणजेच भाजपच्या वरिष्ठांचा आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांचा त्यांना मेसेज आला. त्यातच मी मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. मी जेव्हा सागर बंगल्यावर गेलो होतो तेव्हाच त्यांना मेसेज आला होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. ही माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तकशी बोलताना दिली.

आणखी काय म्हणाले एकनाथ शिंदे?

हे वाचलं का?

    follow whatsapp