‘खरी शिवसेना तुमचीच कशी? कागदपत्रं सादर करा’; निवडणूक आयोगाने ठाकरेंना दिला काही तासांचा वेळ

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खरी शिवसेना कुणाची एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यानंतर आता पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण यावरही दावा सांगितला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना अवघ्या काही तासांची वेळ दिली आहे. खरी शिवसेना तुमचीच कशी याची कागदपत्रं शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत सादर करा असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे राखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आज काय केलं?

शिवसेनेत एकानाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दोन गट पडले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण कुणाचा हा फैसला निवडणूक आयोग करणार असं म्हटलं आहे. त्यानंतर आता शिंदे विरूद्ध ठाकरे हा सामना निवडणूक आयोगाच्या दारात आला आहे. दोन्ही गटांनी आज नाव आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यासंदर्भातले दस्तावेज निवडणूक आयोगाकडे सोपवले आहेत.

अनिल देसाई यांनी काय म्हटलं आहे?

आम्ही आमची कागदपत्रं सादर करण्यासाठी आणखी अवधी मागितला आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना कागदपत्रं सादर करण्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कोणत्या तीन मुद्द्यांवर घेरणार?

१) शिवसेनेचा जो वाद आहे त्यात निवडणूक आयोगाला शिंदे गटाने कोणती कागदपत्रं सादर केली आहेत ? ती मागितली आहेत. अद्याप ही कागदपत्रं शिंदे गटाकडून देण्यात आलेली नाहीत. शिंदे गटाकडून पक्ष आमचाच आहे ही कागदपत्रं जी सादर केली गेली आहे त्याची आम्हाला माहिती नाही असंही ठाकरे गटाने सांगितलं आहे. त्यामुळे आम्हाला मुदत मिळावी असं अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

२) शिंदे गटाने असं म्हटलं आहे की प्रतिनिधी, मुख्यनेता म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण या चिन्हासाठी आमचा विचार व्हावा असं शिंदे गटाने म्हटलं आहे. तसंच अंधेरीला जी पोटनिवडणूक होणार आहे त्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होऊ शकतो त्यामुळे लवकर निर्णय घ्यावा असंही निवडणूक आयोगाला म्हटलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंड केलं तेव्हाच त्यांना नेतेपदावरून काढून टाकलं आहे हा युक्तीवाद ठाकरेंकडून केला जाऊ शकतो.

ADVERTISEMENT

३) अंधेरी पोटनिवडणूक काही दिवसातच येणार आहे. ३ नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झाली आहे. त्यांचं नोटिफिकेशन निघालं आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जी परिस्थिती असते ती जैसे थेच राहण्याची शक्यता असते. त्यामुळे यावरून ठाकरे गटाकडून युक्तीवाद केला जाऊ शकतो. कारण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तो कार्यक्रम रद्द करता येत नाही हा मुद्दा पुढे येऊ शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT