एकनाथ शिंदेंचा फोन, कैलास पाटलांनी उपोषण केलं स्थगित; आंदोलनस्थाळावरुन पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

मुंबई तक

उस्माानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सातव्या दिवशी उपोषण तात्पूर्त स्थगित केलं आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदच उपोषणाला बसले होते. आज रविवारी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उस्माानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सातव्या दिवशी उपोषण तात्पूर्त स्थगित केलं आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदच उपोषणाला बसले होते. आज रविवारी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे.

विरोधीपक्ष नेता अंबादास दानवेंनी घेतली कैलास पाटील यांची भेट

कैलास पाटील यांनी 2020 आणि 2021 सालचा पीकविमा मिळावा आणि अवेळी झालेल्या अतिवृष्ठीमुळे झालेल्या नुकसानी भरपाई मिळावी, यामागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले होते. सात दिवसात त्यांची प्रकृती देखील खालावली होती. स्वत: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कैलास पाटील यांच्याशी चर्चा केली. तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा केली. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आणि प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केले आहे. ज्यामध्ये अंबादास दानवे यांनी सकारात्मक मध्यस्थी केली.

उपोषण स्थगित केल्यानंतर कैलास पाटील थेट बांधावर

सातव्या दिवशी उपोषण स्थगित केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासाह आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट अतिवृष्ठीत नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. वैद्यकिय तपासणीच्या आदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेणं गरजेचं होतं, म्हणून मी येथे आलो, असं कैलास पाटील यांनी माध्यमांना सांगितलं. मी माझे उपोषण हे स्थगित केले आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात जर पैसे आले नाहीत तर माझाच लढा सुरुच राहील, असं कैलास पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp