बेळगाव : आर. आर. पाटलांनी दाखवलेलं धाडस CM शिंदे करणार का? महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र

मुंबई तक

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण करुन देत महाराष्ट्र एकीकरण समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. यात येत्या १९ डिसेंबरला मराठी भाषिकांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकरामधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींना पाठवून द्यावं अशी विनंती करण्यात आली आहे. काय म्हटलं आहे या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण करुन देत महाराष्ट्र एकीकरण समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. यात येत्या १९ डिसेंबरला मराठी भाषिकांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकरामधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींना पाठवून द्यावं अशी विनंती करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे या पत्रात?

१९५६ साली भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश अन्यायाने म्हैसूर राज्यात (आताचे कर्नाटक) डांबण्यात आला. हा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी येथील मराठी भाषिक जनता गेली ६६ वर्ष विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. सत्याग्रह मोर्चे, धरणे, उपोषणे, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या भेटीगाठी अशा विविध मार्गांनी प्रयत्न सुरु आहेत. अनेक वेळा प्रयत्न करुनही प्रश्नाची सोडवणूक न झाल्याने महाराष्ट्र सरकारने सर्वोच न्यायालयात दावा दाखल केला आहे.

महाराष्ट्राने दावा दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी खाजगी संस्थेच्या जागेत सन २००६ पासून अधिवेशन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये सुवर्णविधानसौध बांधून आपला हक सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मराठी जनतेवर विविध तऱ्हेने अन्याय चालू केला आहे. मराठी भाषेत कोणतेही कागदपत्र न देणे, वेगवेगळ्या कारणास्तव कार्यकत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य अंधःकारमय करणे, महाराष्ट्रीय नेत्यांना बेळगावात येण्यास प्रतिबंध करणे इ. गोष्टी सरकार करीत आहे. महाराष्ट्र सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे महत्वाचे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp