शिवसेनेतल्या बंडामुळे सत्ता उद्धव ठाकरेंची गेली… मात्र सुप्रिया सुळेंचं टेन्शन का वाढलं?

मुंबई तक

शिवसेनेत २१ जूनला बंड झालं. त्यानंतर राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे गटाची आणि उद्धव ठाकरे गटाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली. या प्रकरणी बुधवारी सुनावणी होती. त्या दरम्यान परिस्थिती आहे तशी ठेवत पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. मात्र शिवसेना दुभंगली आहे हे सांगायला कुणाही ज्योतिषाची गरज नाही. या सगळ्या लढाईत सर्वात जास्त नुकसान झालं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेत २१ जूनला बंड झालं. त्यानंतर राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे गटाची आणि उद्धव ठाकरे गटाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली. या प्रकरणी बुधवारी सुनावणी होती. त्या दरम्यान परिस्थिती आहे तशी ठेवत पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. मात्र शिवसेना दुभंगली आहे हे सांगायला कुणाही ज्योतिषाची गरज नाही. या सगळ्या लढाईत सर्वात जास्त नुकसान झालं आहे ते उद्धव ठाकरे यांचं. उद्धव ठाकरे यांची फक्त सत्ता गेली नाही तर शिवसेनाही हातातून जाण्याची भीती आहे. मात्र या सगळ्यात सुप्रिया सुळे यांचं टेन्शन वाढलं आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तर गेलंच पण आता शिवसेना हा पक्षही त्यांच्या हातून जाण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा सगळ्या परिस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही टेन्शन वाढलं आहे. राजकीय समीकरणंच आता अशी तयार झाली आहे की त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

उद्धव ठाकरे यांची फक्त सत्ता गेली नाही तर शिवसेनाही हातातून जाण्याची भीती

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तर गेलंच पण आता शिवसेना हा पक्षही त्यांच्या हातून जाण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा सगळ्या परिस्थितीत शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही टेन्शन वाढलं आहे. राजकीय समीकरणंच आता अशी तयार झाली आहे की त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

सुप्रिया सुळे यांचं टेन्शन नेमकं का वाढलं आहे?

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांनी जेव्हा बारामतीतून निवडणूक जिंकली तेव्हा त्या ५० हजार मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपच्या कांचन कौल त्यांच्या विरोधात होत्या त्यांना सुमारे १ लाख मतांनी सुप्रिया सुळे यांनी हरवलं. त्यावेळी सर्वाधिक मतं सुप्रिया सुळे यांना बारामती शहरातून आली होती. त्यानंतर पुरंदर, इंदापूर आणि भोर या ठिकाणाहूनही चांगली मतं सुप्रिया सुळेंना मिळाली होती. मात्र दौंड आणि खडकवासला या ठिकाणी त्या पिछाडीवर होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp