बरं झालं महात्मा गांधींना मारलं, आज असते तर झुरून मेले असते -तुषार गांधी
‘बर झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी दिली आहे. तुषार गांधी हे सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. सांगलीत क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त […]
ADVERTISEMENT

‘बर झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी दिली आहे. तुषार गांधी हे सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. सांगलीत क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्य लढ्यातील प्रति सरकारचे योगदान’ या विषयावर व्याख्यान आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी तुषार गांधी यांनी संवाद साधला.
लोकशाही वाचवण्यासाठी प्रति सरकारची गरज वाटत नाही का?, तुषार गांधींचा सवाल
75 वर्षात आदर्श पात्र लोकं इतिहासातच का राहिले? महाराष्ट्राची परिस्थिती आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रतिसरकारची गरज वाटत नाही का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या राज्यात गद्दारांची संख्या आहे. स्वातंत्र्य संग्रामात बेमानी करणारे आणि आता ज्यांच्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या सोबतच गद्दारी करणारे, अशा दोन प्रकारच्या गद्दारांची मिळून सध्या राज्यात सत्ता आहे, अशी टीका तुषार गांधी यांनी केली. यादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे आणि फसनवीस सरकारवर घणाघाती टीका केली.
लोकशाही जिवंत आहे का?