मोदी सरकार आणखी चार सरकारी कंपन्या विकणार; संभाव्य खरेदीदारांशी चर्चा सुरू
टाटा समूहाला एअर इंडिया विकल्यानंतर सरकारने आता त्याच्या सहाय्यक कंपन्यांचीही विक्री करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. सरकारने बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आय स्क्वेअर कॅपिटलसह संभाव्य बोलीदारांशी चर्चा सुरू केली आहे. एअर इंडियाच्या या चार उपकंपन्या आहेत एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड(AITSL), एअरलाईन अलायड सर्व्हिसेस लिमिटेड (AASL) किंवा अलायन्स एअर(AA), एअर इंडिया इंजिनीअरिंग […]
ADVERTISEMENT

टाटा समूहाला एअर इंडिया विकल्यानंतर सरकारने आता त्याच्या सहाय्यक कंपन्यांचीही विक्री करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. सरकारने बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आय स्क्वेअर कॅपिटलसह संभाव्य बोलीदारांशी चर्चा सुरू केली आहे. एअर इंडियाच्या या चार उपकंपन्या आहेत
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड(AITSL), एअरलाईन अलायड सर्व्हिसेस लिमिटेड (AASL) किंवा अलायन्स एअर(AA), एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AASL) आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (HCI)
मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे
एका अधिकाऱ्याने बिझनेस टुडेला सांगितले की, संभाव्य बोलीदारांसह योजनेवर काम सुरू करण्यात आले आहे. आमच्याकडे सर्व उपकंपन्या विकण्यासाठी कॅबिनेटची मंजुरी आधीच आहे. बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आय स्क्वेअर कॅपिटलने एआयटीएसएलच्या अधिग्रहणासाठी स्वारस्य दाखवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही काही काळापासून बर्ड ग्रुपच्या संपर्कात आहोत. आमची योजना सहाय्यक कंपन्यांचे कमाई करणे आणि लवकरात लवकर दायित्वे निकाली काढणे आहे. कारण थकीत कर्जात आणखी वाढ होत आहे.