Lok Sabha Election 2024 : नितीश कुमारांनी रणशिंग फुंकले! मोदींविरोधात टाकला पहिला डाव

मुंबई तक

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीला अवकाश असला तरी राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केलीये. बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा जदयूचे नेते नितीश कुमार यांनी थेट भाजपलाच आव्हान देण्यास सुरूवात केलीये. विरोधकांची एकजूट बांधण्यात व्यस्त असलेल्या नितीश कुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पहिली चाल चालल्याची चर्चा सुरू झालीये. लोकसभा निवडणूक २०२४ अजून दीड वर्षांचा वेळ आहे. असं असलं […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीला अवकाश असला तरी राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केलीये. बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा जदयूचे नेते नितीश कुमार यांनी थेट भाजपलाच आव्हान देण्यास सुरूवात केलीये. विरोधकांची एकजूट बांधण्यात व्यस्त असलेल्या नितीश कुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पहिली चाल चालल्याची चर्चा सुरू झालीये.

लोकसभा निवडणूक २०२४ अजून दीड वर्षांचा वेळ आहे. असं असलं तरी राजकीय पक्षांनी अजेंडा समोर ठेवत काम सुरू केलंय. भाजप आणि एनडीएतून दूर झालेल्या नितीश कुमार यांनी विरोधकांची मोट बांधण्यास सुरूवात केलीये. यातच आता नितीश कुमार यांनी मागासलेल्या राज्यांसाठी मोठी घोषणा केलीये.

केंद्रात बिगर भाजपचं सरकार आल्यास आपण देशातील सर्व विकासाच्या बाबतीत मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा देऊ, असं नितीश कुमार यांनी म्हटलंय. नितीश कुमार यांच्या याच घोषणेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीश कुमारांची ही पहिली चाल असल्याचं बघितलं जातंय.

Lok Sabha Election 2024 : नितीश कुमार नक्की काय म्हणाले?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘२०२४ मध्ये जर केंद्रात आम्हाला सरकार स्थापनेची संधी मिळाली, तर आम्ही निश्चितपणे मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा देऊ. मी फक्त हे बिहारबद्दल बोलत नाहीये, तर इतर राज्यांबद्दलही बोलतोय. ज्यांना विशेष दर्जा मिळायला हवा. आमची पार्टी नेहमीच बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा, याची मागणी करत आलीये’, असं मत त्यांनी मांडलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp