तुकारामांचे अभंग ते सावरकरांचा दाखला.. देहूमधील PM मोदींच्या भाषणातील 11 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई तक

देहू: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (14 जून) तीन कार्यक्रमांनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थित असलेल्या सर्व वारकऱ्यांना संबोधित केलं. ज्यामध्ये त्यांनी वारी पांडुरंगाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच मात्र, त्याशिवाय आपलं सरकार कशा पद्धतीने कारभार करत आहे यावरही भाष्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देहू: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (14 जून) तीन कार्यक्रमांनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थित असलेल्या सर्व वारकऱ्यांना संबोधित केलं. ज्यामध्ये त्यांनी वारी पांडुरंगाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच मात्र, त्याशिवाय आपलं सरकार कशा पद्धतीने कारभार करत आहे यावरही भाष्य केलं आहे.

जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या देहूमधील भाषणातील 11 महत्त्वाचे मुद्दे:

1. पालखी मार्गाचं काम हे तीन चरणात पूर्ण होईल. 350 किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे यामध्ये तयार केला जाणार आहेत. यावेळी 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार.

2. ज्या शिळेवर तुकाराम महाराांनी सलग 13 दिवस तपस्या केली ती शिळा फक्त शिळा नाही तर ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शिळा आहे. येथे आपण जे पुननिर्माण केलं आहे त्यासाठी आभार व्यक्त करतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp