ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांचा राजीनामा; बैठकीआधीच जयंत पाटलांचं मोठं विधान

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

sharad pawar is still firm on the decision of his resignation said jayant patil
sharad pawar is still firm on the decision of his resignation said jayant patil
social share
google news

Sharad Pawar Resignation: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची जी घोषणा केली आहे त्यावर ते अद्यापही ठाम आहेत. असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. (sharad pawar is still firm on the decision of his resignation said jayant patil)

पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले:

‘शरद पवार आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम’

‘पवार साहेबांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मतापासून किंवा निर्णयापासून ते अद्याप बाजूला गेलेले नाहीत. त्यांची भूमिका कायम आहे. पण महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते त्यांना साकडं घालत आहे. अनेक जण त्यांना हा निर्णय मागे घेण्याचा आग्रह करत आहेत. पण शरद पवार साहेब हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहेत.’

‘कार्यकर्त्यांची भावना मी पवार साहेबांपर्यंत पोहचवली. सर्वांचा आग्रह आहे की, येत्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांपर्यंत पक्षाचं अध्यक्षपद सोडू नये अशी सर्वांची इच्छा आहे.’ असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

‘माझ्या दिल्लीत ओळखी नाही, त्यामुळे मी अध्यक्ष…’

‘सरोज पाटील यांनी माझं अध्यक्षपदासाठी माझं नाव घेतलेलं असलं तरीही मी महाराष्ट्रात काम करतोय. महाराष्ट्र सोडून दिल्लीची जबाबदारी… माझ्या दुसऱ्या राज्यात ओळखीही नाही आणि संपर्कही नाही. त्यामुळे दिल्लीत बसणाऱ्या लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या आणि देश काही वर्ष संसदेत बसून बघणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात.’

‘पवार साहेबांना तो अनुभव आहे म्हणून पवार साहेब यशस्वीपणाने देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचं काम करू शकले. पण आता पवार साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत त्यांनी अजूनही आम्ही त्यांना सांगतोय की, असं करणं योग्य नाही. पण पक्ष पुढे नेण्यासाठी काही तरी पाऊलं टाकली पाहिजेत. अशी त्यांची भूमिका दिसतेय.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट

‘मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सगळ्यात जास्त काळजी आहे की, म्हणून आम्हाला वाटतं की, 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा होईपर्यंत पवार साहेब अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील. त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की, त्यांनी अध्यक्षपद सोडू नये. पण पवार साहेब त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.’ असं विधान करत जयंत पाटील यांनी आपल्या राष्ट्रीय राजकारणापेक्षा राज्यातच अधिक रस असल्याचे संकेत यातून दिले आहेत.

‘हा राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न’

‘माझ्याकडे बऱ्याच जणांचे राजीनामे आले आहेत. त्यामुळे पवार साहेब नाहीत म्हटल्यावर लोकं नाराज झाले आहेत. पवार साहेब नसतील तर पक्षात आपल्याला न्याय मिळेल का? अशी भावना अनेक लोकांची झाली आहे. त्या भीतीपोटी किंवा नाराजीपोटी राजीनामा देत आहेत.’

ADVERTISEMENT

‘भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा या लोकांमध्ये सुरू असतात. पण त्यासाठी पवार साहेब एवढा मोठा निर्णय घेतील असं वाटत नाही. आता आम्ही निवडणुकीची तयारी करणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारची चर्चा करणं हे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.’ असं म्हणत पाटलांनी राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘…म्हणून वज्रमूठ सभा आम्ही पुढे ढकलल्या’

‘वज्रमूठ सभा पुढे जाण्याचं कारण म्हणजे ऊन प्रचंड वाढणार आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचं देखील संकट आहे. त्यामुळे एवढी मोठी सभा होणं कठीण आहे. आमची नाशिकला सभा व्हायची आहे. पुण्यात होणार आहे. कोल्हापूरला करायची आहे. पण त्या आम्ही पुढे कधीही करू शकतो.’

‘मे महिन्यातील सभा जरी सहा वाजता ठेवली तरी लोकांना सभेसाठी घरातून 2 वाजता निघावं लागतं. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो हे आम्हाला मुंबईच्या सभेत देखील जाणवलं. म्हणून आम्ही एकत्रित बसून असं ठरवलं की, तूर्त या हवामानाचा विचार करता.. सभा पुढे ढकलू आणि हवामान चांगलं झाल्यावर सभा पुन्हा घेऊ’

हे ही वाचा>> ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव नाही’, शरद पवार विरुद्ध संजय राऊत ‘सामना’

‘महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार. महाविकास आघाडी किंवा पक्षात पवार साहेब हे आजही आहेत. ते काम करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणता तडा जाईल असं वाटत नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सक्षमपणे महाराष्ट्रात पुढे काम करेल असा मला विश्वास आहे.’ असं म्हणत जयंत पाटलांनी महाविकास आघाडी मजबूत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

‘मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम भाजपकडून सुरू’

‘भाजप मुंबईतील अनेक महत्त्वाचे उपक्रम हे बाहेरच्या राज्यात नेत आहेत आणि मुंबईचं स्थान हे देशातील इतर राज्यांपेक्षा जेवढं उच्च होतं.. पण महत्त्वाचे प्रकल्प बाहेर नेल्यामुळे काही प्रश्न तयार होतात. त्यामुळे जनतेत अशी भावना आहे की, मुंबईतील महत्त्वाची केंद्र दुसऱ्या राज्यात जात आहेत.’

‘पवार साहेबांचं जे मत आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू देणार नाही. ते शक्यही नाही. पण मुंबईची जी बलस्थानं आहेत ती कमकुवत करण्याचे प्रयत्न चालला आहे हे मात्र खरं आहे.’ असं मतही जयंत पाटलांनी व्यक्त केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT