Congress president result : मतमोजणीदरम्यान शशी थरूर गटानं घेतला आक्षेप; निवडणूक अधिकाऱ्याकडे केली तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, शशी थरूर यांचे पोलिंग एजंट सलमान सोझ यांनी निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाची लेखी तक्रार काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे केली आहे. पंजाब, यूपी, तेलंगणा या तीन राज्यांतील निवडणुकीत हेराफेरीचा आरोप सलमान सोझ यांनी केला आहे.देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान झाले होते. ९,९१५ पैकी ९,५०० हून अधिक प्रतिनिधींनी मतदान केले होते.

24 वर्षानंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यालयात मतमोजणी सुरू आहे. सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होतील. 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात ६व्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कधी-कधी झाल्या निवडणुका?

1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्यानंतर देवकांत बरुआ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ब्रह्मानंद रेड्डी यांनी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिद्धार्थ शंकर रे आणि करण सिंह यांचा पराभव केला. 20 वर्षांनंतर 1997 मध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांच्यात तिरंगी लढत जिंकली. केसरीला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काही भाग वगळता सर्व राज्य काँग्रेस युनिटचा पाठिंबा होता. त्यांना 6,224 मते मिळाली, तर पवार यांना 882 आणि पायलट यांना केवळ 354 मते मिळाली.

ADVERTISEMENT

-2000 मध्ये, जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा पहिल्यांदाच कोणीतरी गांधी कुटुंबातील सदस्याला आव्हान देण्यात आले होते. जितेंद्र प्रसाद यांनी या निवडणुकीत सोनिया गांधींविरोधात दावा ठोकला होता. या निवडणुकीत प्रसाद यांचा दारूण पराभव झाला होता. सोनियांना ७,४०० हून अधिक मते मिळाली, तर प्रसाद यांच्या खात्यात ९४ मते होती.

ADVERTISEMENT

– सर्वाधिक काळ काँग्रेस अध्यक्षपद भूषवणाऱ्या सोनिया गांधी या एकमेव नेत्या आहेत. 1998 पासून ते या पदावर आहेत. मात्र, 2017 आणि 2019 मध्ये राहुल गांधींनी हे पद स्वीकारले. स्वातंत्र्यानंतर 40 वर्षांपासून नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्यच पक्षाच्या सर्वोच्च पदावर आहेत. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या एकाच कुटुंबातील पाच जणांनी काँग्रेस अध्यक्षपद भूषवले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT