उद्धव ठाकरे अजून किती गद्दारी करणार? AIMIM चा उल्लेख करत भाजपचा सवाल

मुंबई तक

शिवसेना फुटली. 40 आमदार आणि 13 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे ठाकरेंना महाराष्ट्रभर मोठा धक्का बसला. शिंदे गट आणि भाजपशी लढा देण्यासाठी आधीच महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे संकेत दिलेत. तशी चर्चाही सुरू असून, भाजपनं यावरून उद्धव ठाकरेंना सवाल केलाय. प्रबोधनकार डॉट कॉम कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

शिवसेना फुटली. 40 आमदार आणि 13 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे ठाकरेंना महाराष्ट्रभर मोठा धक्का बसला. शिंदे गट आणि भाजपशी लढा देण्यासाठी आधीच महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे संकेत दिलेत. तशी चर्चाही सुरू असून, भाजपनं यावरून उद्धव ठाकरेंना सवाल केलाय.

प्रबोधनकार डॉट कॉम कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही एकत्र येण्याचे संकेत दिले. प्रकाश आंबेडकरांनी याच कार्यक्रमानंतर आगामी निवडणुकीत एकत्र येऊ, असंही म्हटलं. त्यामुळे संभाजी ब्रिगेडनंतर प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडीही उद्धव ठाकरेंसोबत येणार असल्याची शक्यता राज्याच्या राजकारणात सुरूये.

जोगेंद्र कवाडेंशी हातमिळवणी करून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना शह देण्यात यशस्वी होतील?

प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी निवडणुका एकत्र लढताना दिसली, असं म्हटलं जात आहे. त्याचे संकेतही दोन्ही बाजूंनी दिले जात आहे. या आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात भाजपनंही भूमिका मांडताना ठाकरेंना सवाल केलाय.

हे वाचलं का?