याच ठाकरेंनी ७/१२ कोरा करायचं आश्वासन दिलंं होतं : पाहणी केलेल्या शेतकऱ्याने दाखवला आरसा

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवारी) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या औरंगाबादमध्ये गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली.

या दरम्यान ठाकरे ज्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते त्याच शेतकऱ्यांनी मुंबई तकशी बोलताना ठाकरे यांना आरसा दाखविला आहे. हे शेतकरी म्हणाले, उद्धव ठाकरे पाहणीसाठी आले खरे, पण शेतकऱ्यांना त्यांची मदत व्हायला पाहिजे. नुसतं येऊन बघून जाऊन काही होत नसतं. त्याचा प्रतिसाद मिळायला हवा. तसंच थोड्याश्या वेळात बांधावर उभं राहून देखील नुकसान काय झालं हे कळतं नसल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं.

याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करू असं आश्वासन दिलं होते. पण मुख्यमंत्री असताना केलं का? असा सवालही या शेतकऱ्यांनी विचारला. मागील अनेक वर्षांपासून आम्हाला फक्त आश्वासन मिळतं आहेत, बाकी काही नाही. सरकार कोणाचही असो, मदत मिळत नाही, पंचनामे होत नाहीत. पंचनामे झाले तर मदतीसाठी पाठपुरावा करावा लागतो. मागील वर्षीची मदत अजूनही मिळालेली नाही, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले, एका बाजूला दिवाळी सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं दिवाळं निघालं आहे. शेतकऱ्यापुढे, त्यांच्या मुलांपुढे कपडे, अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण काळजी करु नका, धीर सोडू नका. सरकार नसलं तरी शिवसेना तुमच्या सोबत आहेत. महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षही तुमच्यासोबत आहेत.

गेल्या आठ दिवसात पुण्यातही आतोनात पाऊस पडला. पण उपमुख्यमंत्र्यांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. ते म्हणाले, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. मग आता ते म्हणतील की ग्रामीण भागात पाऊस किती पडावं हे सरकार ठरवतं नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

ADVERTISEMENT

शेतकऱ्यापुढे कायम दोन आपत्ती असतातच. एक म्हणजे दुष्काळ आणि दुसरी अतिवृष्टी. या आपत्ती आपल्या हातात नसतात. पण आपत्ती आल्यानंतर शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नसतं, त्यांचं घरदार उघड्यावर पडणार नाही, याची काळजी घेणं हे आपल्या हातात असतं. आज एकूणचं घोषणांची अतिवृष्टी चालली आहे. पण अंमलबजावणी नाही. या निर्दयी सरकारकडे भावनांचा कोरडा दुष्काळ आहे.

ADVERTISEMENT

कोणीही आलेले नाहीत. कृषीमंत्री, मुख्यमंत्री काय करतायतं? हे फक्त उत्सव साजरे करत आहेत. केवळ उत्सवी सरकार आहे. पण हे उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील प्रजा समाधानी आहे की नाही हे पाहण्याचं राज्यकर्त्याचं काम आहे. म्हणून ज्यावेळी हे सरकार बेदरकारपणे सांगतं की ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, म्हणून मी बाहेर पाहणीसाठी आलो. ही माझी प्रतिकात्मक भेट आहे.

शेतकऱ्यांची ५० हजार हेक्टरची मागणी आहे. मी त्यांच्यावतीने ही मागणी करत आहे. म्हणून मी मुद्दाम सांगतो, ही माझ्या मनातील नाही तर जनातील मागणी आहे. बरं पंचनामे कधी करणार? त्यानंतर तुम्ही ते मदतीचं लंगडं घोडं नाचवणार का? शेतकऱ्यांचा अधिकार नाही का दिवाळी साजरी करण्याचा? त्यामुळे पंचनामे होतील तेव्हा होतील पण आधी मदत जाहीर करा. ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर करायला हवा होता. पण भावनांचा दुष्काळ असल्यामुळे ते करेल असं वाटतं नाही. ते करा किंवा नाही, पण आधी माझ्या शेतकऱ्याला मदत जाहीर करा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT