“अशा घुशी खूप पाहिल्या, आता शेपटीला धरायचं अन्…” : गुलाबरावांच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shivsena UBT cheif Uddhav Thackeray Answer to Shivsena Leader Gulabrao Patil in Pachora rally
Shivsena UBT cheif Uddhav Thackeray Answer to Shivsena Leader Gulabrao Patil in Pachora rally
social share
google news

पाचोरा : काही जणांना वाटलं होतं, तेच म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार म्हणे. अशा घुशी खूप पाहिल्या, पण अशा घुशींच्या शेपटीला धरुन त्यांना निवडणुकीत आपटायचं आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दगड घेऊन सभेत घुसणार या आव्हानावर प्रत्युत्तर दिलं. (Shivsena UBT cheif Uddhav Thackeray Answer to Shivsena Leader Gulabrao Patil in Pachora rally)

उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील जाहीर सभेत बोलत होते. खेड, मालेगावनंतर ठाकरे यांची शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा पार पडली.  “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्तुत्तर दिले.

पाकिस्तानही सांगेल, शिवसेना कोणाची… :

पाकिस्तानला विचारल शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगले. पण आमच्याकडे मोतिबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला सांगूनही कळत नाही. त्यात त्यांचा धृतराष्ट्र झाला ही त्यांची चुकी नाही. ही गर्दी बघितल्यावर कळतं शिवसेना कोणाची. पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘नाही रे बाबा मी त्यांचा बाप नाही :

मी आल्यानंतर मगाशी कोण तरी म्हणालं, आला रे आला गद्दारांचा बाप आला. अजिबात नाही. असली घाणेरडी आणि गद्दार औलाद आपली असूच शकत नाही. पाठीवरती सोडच पण आईच्या कुशीवरती वार करणारी गद्दारांची औलाद ही आमची असू शकत नाही, असं म्हणतं ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर सणसणीत टीका केली.

आर. ओ. पाटील यांच्या आठणवीत भावूक :

यावेळी उद्धव ठाकरे सभेच्या सुरुवातीलाच माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या आठवणीत भावूक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, आज खरच तात्यांची उणीव भासते. एक कणखर खंदा, जिद्दी, मेहनती आणि अत्यंत विश्वासू सहकारी जाणे हे फार मोठं नुकसान असतं. 40 गद्दार, हरामखोर गेले तरी फरक पडत नाही परंतु एक विश्वासू माणूस जातो तेव्हा फार मोठा खड्डा पडतो.

ADVERTISEMENT

एका तरी शेतकऱ्यापर्यंत मदत पोहचली का?

नैसर्गिक आपत्तीची एका तरी शेतकऱ्याला मदत पोहचली का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थितांना विचारला. ते म्हणाले, आपलं सरकार होतं तेव्हा कोरोनाच संकट होतं. नैसर्गिक चक्रीवादळ येत होती. पण ज्या-ज्या वेळेस संकटं येत होती त्या त्या वेळी सरकारची मदत मिळत होती का नव्हती? पण आता हे उलट्या पायाचं सरकार स्वत:च एक संकट आहे. गारपीट काय होते, अवकाळी पाऊस काय पडतो. पण मला सांगा, एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहचली का? शेतकर्‍यांना पीक विम्याचे पैसे मिळाले का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

ADVERTISEMENT

भाजपचं आव्हान वाटतं का?

मध्यंतरी एका वृत्तपत्राने माझी मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विचारलं, भाजप हे आव्हान आहे का? मी म्हटलं भाजप आव्हान नाही, बिल्कुल नाही. पण जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत देशात आणि राज्यात जे नुकसान करतील ते पुन्हा भरुन कसं काढायचं हे माझ्यासमोरील मोठं आव्हान आहे, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT