ठाकरेंना ‘मशाल’ देणारा बाळासाहेबांच्या मित्राचा पक्ष राजकारणातून नामशेष कसा झाला?
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री उशीरा ठाकरे गटाला मशाला हे नवीन चिन्ह दिलं. सोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नावं देत ओळख देखील दिली. ठाकरे गटानं उगवता सुर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली होती. मात्र त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह आणि उगवता सुर्य हे तमिळनाडूत द्रमुक पक्षाचे आरक्षित चिन्ह असल्याचं कारण आयोगाकडून देण्यात आलं. ठाकरे […]
ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री उशीरा ठाकरे गटाला मशाला हे नवीन चिन्ह दिलं. सोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नावं देत ओळख देखील दिली. ठाकरे गटानं उगवता सुर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली होती. मात्र त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह आणि उगवता सुर्य हे तमिळनाडूत द्रमुक पक्षाचे आरक्षित चिन्ह असल्याचं कारण आयोगाकडून देण्यात आलं.
ठाकरे गटाला ‘मशाल’
त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या तिसऱ्या पर्यायावर विचार करत त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह देऊ केलं. मात्र मशाल हे चिन्हही कधीकाळी समता पक्षाचे राखीव चिन्ह होते. परंतु हा पक्ष आता देशाच्या राजकारणात औषधालाही सापडत नाही. निवडणुकांमध्ये कोणतीही लक्षणीय कामगिरी न करु शकल्याने आयोगाने हा पक्ष २००४ साली निष्क्रिय यादीत टाकला आहे. या पक्षाला आता राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा नाही.
समता पक्षाला मिळाली होती ‘मशाल’ :
नितीश कुमार आणि १४ खासदारांना सोबत घेत जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता दलाशी फारकत घेतली. सर्वांनी एकत्र येत १९९४ मध्ये जनता दल (जॉर्ज) ची स्थापना केली. त्याच वर्षी या पक्षाचे नाव बदलून समता पक्ष करण्यात आले. तसेच मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं. १९९५ सालची बिहार विधानसभा निवडणुका समता पक्षाने स्वबळावर लढविली, परंतु केवळ ७ जागांवर यश मिळालं.
१९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी मिळाली. नितीश कुमार रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते. १९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी मिळाली. नितीश कुमार रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते. १९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी मिळाली. नितीश कुमार रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते.