नामांतर पूर्ण! औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांबाबत आदेश निघाला

मुंबई तक

Aurangabad | Osmanabad : मुंबई : राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन्ही शहारांच्या नामांतरापाठोपाठ आता या दोन्ही जिल्हा आणि तालुक्याचंही नाव बदलण्यात आलं आहे. सोमवारी (२७ फेब्रुवारी) रात्री उशीरा महसूल, वन आणि नगरविकास विभागाने याबाबतची अधिसुचना जारी केली. यानुसार आता विभाग, उपविभाग, जिल्हे, शहर, तालुका, गाव, महापालिका, नगरपालिका अशा सर्व पातळ्यांवर नामांतर प्रक्रिया पूर्ण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Aurangabad | Osmanabad :

मुंबई : राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन्ही शहारांच्या नामांतरापाठोपाठ आता या दोन्ही जिल्हा आणि तालुक्याचंही नाव बदलण्यात आलं आहे. सोमवारी (२७ फेब्रुवारी) रात्री उशीरा महसूल, वन आणि नगरविकास विभागाने याबाबतची अधिसुचना जारी केली. यानुसार आता विभाग, उपविभाग, जिल्हे, शहर, तालुका, गाव, महापालिका, नगरपालिका अशा सर्व पातळ्यांवर नामांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (After the name change of Aurangabad and Osmanabad cities in the state, now the name of both the district and taluka has also been changed)

केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp