महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटलांनी घेतली बावनकुळेंची भेट, वाचा Inside स्टोरी

ऋत्विक भालेकर

जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची एक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) नेते जयंत पाटील यांची बावनकुळे यांच्या सरकारी निवासस्थानी काल (24 फेब्रुवारी) रात्री 8 वाजता भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या भेटीवेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं बोललं जात आहे. 

आधी बावनकुळे यांच्याकडून मंत्रालयात जयंत पाटील यांना वेळ देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ठिकाण बदलण्यात आणि त्यांना बंगल्यावर बोलावण्यात आलं. दरम्यान, या भेटीनंतर जयंत पाटील आज हिंगोली-नांदेड दौऱ्यासाठी रवाना झाले.

'मी जयंत पाटलांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही'

दरम्यान, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा या भेटीबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, 'जयंत पाटील काल सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषयाला घेऊन भेट घेण्यासाठी आले होते. विखे-पाटील सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्यानं भेट झाली.'

हे ही वाचा>> Thane : आईनंच घेतला 17 वर्षाच्या दिव्यांग लेकीचा जीव, आजीच्या मदतीनं लावली मृतदेहाची विल्हेवाट, प्रकऱण काय?

'सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांना मी आश्वासन दिले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या 14 समस्या संदर्भात बैठक माझ्या दालनात लावून सोडवणार आहे.'

हे वाचलं का?

    follow whatsapp