बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले? सुषमा अंधारेंनी सगळं सांगितलं VIDEO

मुंबई तक

Sushma Andhare and Uddhav Thackeray on Barshi Politics : बार्शी तालुक्यात भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांनी मागील काही निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशामुळे त्यांची ताकद वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी आमदार दिलीप सोपल यांनी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणल्याचं सांगितलं जातंय.

ADVERTISEMENT

Sushma Andhare and Uddhav Thackeray on Barshi Politics
Sushma Andhare and Uddhav Thackeray on Barshi Politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

point

सुषमा अंधारेंनी सगळं सांगितलं

Sushma Andhare and Uddhav Thackeray on Barshi Politics : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याची घोषणा झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी ही गणितं जुळवल्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, बार्शीतील या युतीबाबत आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या? 

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बार्शीतील या युतीबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला. सुषमा अंधारे बार्शीतील महाआघाडीविषयी बोलताना म्हणाल्या, "कालपासून बार्शीच्या विषयावर चर्चा सुरु आहे. मला सोलापूर माहिती नव्हतं. त्यामुळे मला वाटलं की, मी पक्षप्रमुखांना बार्शीविषयी विचारलं पाहिजे. माझ्या संघटनेला विचारलं पाहिजे की असं काही घडतंय तर त्यावर आपला स्टँड काय?  मी यावर स्पष्ट सांगते की, बार्शीचा निर्णय तेथील आमदारांनी त्यांच्या विवेकाला अनुसरुन घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय संघटनेचा निर्णय नाही. हे स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगत आहे. बार्शीच्या आमदारांनी स्थानिक गणितं विचारात घेऊन घेतलेला निर्णय आहे. मी उद्धव ठाकरेंशी याबाबत बोलले. पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की, मी स्वतंत्रपणे दिलीप सोपल यांच्याशी बोलणार आहे. उशीरा रात्री त्यांचं बोलणं झालं असेल तर मला कल्पना नाही. जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार आम्ही एकटे लढतोय. भाजपविरोधात लढत आहे, त्या सर्वांच्या आम्ही सोबत आहोत. 

हेही वाचा : मुंबई : लोकल ट्रेनमध्ये वादावादी अन् प्राध्यापकाची हत्या, मालाडमधील घटनेचं CCTV फुटेज समोर VIDEO

राजेंद्र राऊतांविरोधात लढण्यासाठी दिलीप सोपलांची खेळी 

दरम्यान, बार्शी तालुक्यात भाजपचे  नेते राजेंद्र राऊत यांनी मागील काही निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशामुळे भाजपची ताकद वाढत असल्याचं चित्र आहे. नगरपरिषद आणि बाजार समिती निवडणुकांमधील भाजपने राऊतांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवलाय. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी आमदार दिलीप सोपल यांनी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणल्याचं सांगितलं जातंय. स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतलाय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp