राम मंदिरातील चोरीबाबत राहुल गांधींचं पीएम मोदींना पत्र, नेमंक काय म्हणाले?
rahul gandhi letter to pm modi : राम मंदिरातील चोरीप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"आपले मौन अस्वीकार्य आहे"
राम मंदिरातील चोरीबाबत राहुल गांधींचं पीएम मोदींना पत्र
rahul gandhi letter to pm modi ayodhya ram mandir donation theft case : राम मंदिरातील चोरीप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मंदिरातील चोरी प्रकरणात आठ आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून मंदिराच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी सुरू केली आहे. यासोबतच ट्रस्टमधील काही वरिष्ठ पदाधिकारी तसेच वेळोवेळी ट्रस्टच्या कामकाजाशी संबंधित राहिलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासाच्या कक्षेत आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? जाणून घेऊयात..
हेही वाचा : "त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास, कृपया ...", अभिजीत दिपकेंचं आई-वडिलांबाबत सर्वांना महत्त्वाचं आवाहन
राहुल गांधी यांची राम मंदिर चोरीसंदर्भात पोस्ट
"पंतप्रधानजी, कोट्यवधी भाविकांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून श्रद्धेने श्रीराम मंदिरात देणग्या अर्पण केल्या आहेत. त्या देणग्यांमधील कथित चोरीची बाब आता कोणापासूनही लपून राहिलेली नाही. या ट्रस्टमधील प्रत्येक सदस्याची नियुक्ती आपल्या सरकारने केली आहे. त्यामुळे या कथित देणगी चोरीप्रकरणी आपले मौन अस्वीकार्य आहे. या प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, संपूर्ण आर्थिक हिशोब सार्वजनिक करण्यात यावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आपल्या सरकारची विश्वासार्हता आता आपण या प्रकरणात कोणती भूमिका घेता आणि काय कारवाई करता, यावर अवलंबून आहे.", असं कॅप्शन राहुल गांधी यांनी ट्वीटरवर पत्र पोस्ट करताना दिलं आहे.
राहुल गांधींनी पीएम मोदींना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं
मा. पंतप्रधान महोदय,










