Babri Demolition: ‘मिंधे जे सत्तेसाठी चाटत बसले, त्यांनी…’, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य जिव्हारी, ठाकरे बरसले
Uddhav Thackeray criticizes Bjp: बाबरी मशिदीवरून बाळासाहेबांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रचंड संतापले असून त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: ‘बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेनेचा (Shiv Sena) बाबरी (Babari) पाडण्याशी काहीही संबंध नव्हता’, असं विधान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (11 एप्रिल) तात्काळ ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद बोलावून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील घणाघाती टीका केली आहे. (babri demolition after chandrakant patil statement uddhav thackeray criticizes bjp and cm shinde)
बाबरी मशिद जेव्हा पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेबांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली. पण असं असताना भाजपकडून मुद्दाम अशी वक्तव्य केलं जात असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद जशीच्या तशी…
‘गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतीली खंदकातून बाहेर पडले. असे बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बरेच उंदीर आता बाहेर पडू लागले आहेत. पण संतापजनक गोष्ट ही आहे की, ज्यावेळेला ही बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हते. अगदी आपले माननीय पंतप्रधानसुद्धा बांगलादेशच्या युद्धात म्हणजे सत्याग्रहात सहभागी होते. पण बाबरीच्या आंदोलनात कदाचित ते हिमालयात असतील ते मला माहित नाही. पण त्यांचंही नाव कुठे आलेलं नव्हतं. तेव्हाचे भाजपचे.. उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी त्यांनी अंगलट येऊ नये यासाठी जाहीर केलं होतं की, बाबरी पाडण्यामध्ये भाजप वैगरे कोणी नाही. हे काम असेल तर शिवसेनेच केलं असेल.’
‘तेव्हा बाळासाहेब एवढे चिडले की.. हा शब्द सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबाबत वापरलाय. म्हणून मी वापरतोय.. बाळासाहेब म्हणाले.. हे कसलं नपुंसक नेतृत्व म्हणे..’










