‘जय बजरंगबली’! उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला, सीमावासीयांना म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticized pm narendra modi ever chant jai bajrangbali
uddhav thackeray criticized pm narendra modi ever chant jai bajrangbali
social share
google news

Uddhav Thackeray Vs Narendra modi : मतदान करताना जय बजरंगबली म्हणून काँग्रेसला धडा शिकवा, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील एका प्रचार रॅलीत केलं. त्यांच्या याच विधानावर बोट ठेवत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत घडलेली घटना सांगत ठाकरेंनी सीमा भागातील मराठी मतदारांना आवाहन केलं आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या सर्वांना कल्पना असेल की, बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांचा (बाळासाहेब ठाकरे) मतदानाचा अधिकार काढला गेला होता, कारण त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून.”

हेही वाचा >> ‘माझा सल्ला शरद पवारांना पचनी नाही पडला तर..,’ उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

“आता कारण नसताना कर्नाटक निवडणुकीत मग तो बजरंग दलाच्या निमित्ताने असेल किंवा आणखी कोणत्या निमित्ताने असेल… मोदीजी जे म्हणाले की, मतदान करताना तुम्ही बजरंग बली की जय असं म्हणा. पंतप्रधान जर असे बोलले असतील, याचा अर्थ निवडणूक कायद्यात बदल झाला असेल, धार्मिक प्रचाराबाबत असं मी मानतो. कारण त्यावेळी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिंदूह्रदयसम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता. ते निवडणूक कधी लढले नव्हते, लढणार नव्हते. पण, त्यांना निवडणूक लढायलाही बंदी केली होती.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सीमावासीयांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

ठाकरे म्हणाले, “आता ज्या अर्थी पंतप्रधान मोदी तिथल्या मतदारांना बजरंगबली की जय बोलून मतदान करा असं सांगत असतील, तर मग मी तिथला कर्नाटकव्याप्त जो महाराष्ट्र आहे आणि तिथल्या माताभगिनींना सांगतोय की, तिथं कोणतंही सरकार आलं. कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतोय.”

हेही वाचा >> Shalini Patil : “सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा, अजित पवारांना अटक होऊ शकते”

“तुम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा जय शिवराय बोलून आपल्या मराठी माणसाची एकजूट जपणाऱ्या मराठी उमेदवारालाच मतदान करा. जेणेकरून महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार निवडून येतील. मी सीमा भागातील, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी माणसांना आवाहन करतोय की, ज्याप्रमाणे मोदींनी सांगितलं जय बजरंगबली बोलून मतदान करा. तुम्ही जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा. पण मराठी माणसाची एकजूट तुटू देऊ नका. एकजुटीची वज्रमूठ दाखवून द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी नक्की काय म्हणाले होते?

कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारात उतरले आहेत. प्रचार सभेत मोदी म्हणाले होते की, “काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यंत्रणा मी मोडित काढली. त्यामुळे त्या पक्षाचे नेते माझा तिरस्कार करतात. माझ्याबद्दल अपशब्द वापरतात. निवडणुकीत काँग्रेस एकतर त्यांच्या निवृत्त होत असलेल्या नेत्यांच्या नावे मते मागतेय किंवा मोदींना शिव्या दिल्या जातात. कर्नाटकातील जनता ही शिवराळ संस्कृती खपवून घेईल का? कर्नाटकची जनता अपशब्द वापरणाऱ्यांना माफ करेल का? आता तुम्ही काय कराल, तुम्ही त्यांना शिक्षा कराल का? तुम्ही जेव्हा मतदान कक्षात जाल, तेव्हा यंत्रावरील बटण दाबताना जय बजरंगबली म्हणा आणि त्यांना शिक्षा करा”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT