NCP Split : ‘या’ निकषावर ठरणार राष्ट्रवादी कुणाची? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटाचा वाद टोकाला गेला आहे. त्यातच 30 जूनच्या अगोदरझालेल्या राष्ट्रवादीतील नियुक्त्या या पवार गटाने घटनाबाह्य ठरवल्या आहेत. तसेच आता नागालँडमधील एनसीपीचा दाखला देत त्यांनी राष्ट्रवादी मोठा दावा केला आहे.
ADVERTISEMENT

Controversy in NCP : राज्यात काल शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या सुनावणीचा विषय ताजा असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Nationalist Congress Party) संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काका-पुतण्याच्या राजकीय वादाला आता गती आल्याने आता साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने असा दावा केला आहे की, 30 जूनपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, आणि ज्या पालन करत नाही, त्या घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होते. मात्र पक्षाचे चिन्ह कोणाला द्यायचे हे मात्र बहुमताच्या आकड्यावर ठरणार असल्याचेही अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गटाचा संघर्ष आता टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे. (controversy rages ncp praful patel ajit pawar faction appointments party are unconstitutional)
बहुमतावर विश्वास
अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील 43 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्याच बरोबर आम्ही बहुमतावर विश्वास ठेवणारे असून कोणताही राजकीय पक्ष हा केवळ स्वतःच्या घटनेच्या घटनात्मकतेवर काम करत असतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेनुसार पक्षातंर्गतही कोणत्याही निवडणुका पार पडल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये 30 जूनपूर्वी झालेल्या नियुक्त्या या घटनाबाह्य असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
नागालँडमध्येही पाठिंबा
राज्यातील घडामोडींबरोबरच प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, नागालँडमधीलही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी मार्चमध्ये राष्ट्रवादीने नागालँडमधील एनडीए सरकारला पाठिंबा दिला त्यावेळची आठवणही त्यांनी करुन दिली.
हे ही वाचा >> Pankaja Munde : वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर जीएसटीची कारवाई, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पक्षावर आणि चिन्हावरही दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात 2 जुलै रोजी अजित पवार यांनी बंड केले. त्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर आणि चिन्हावरही दावा केला आहे. अजित पवार गटाने असा दावा केला आहे की 30 जून रोजी शरद पवार यांच्या जागी अजित पवार हे पक्षाचे प्रमुख असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी आता 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला जाणार आहे.