“अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story

साहिल जोशी

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Politics of Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै रोजी राजकीय गदारोळ झाला. अजित पवार यांनी 8 आमदारांसह राजभवनात शपथ घेताच राष्ट्रवाद काँग्रेसमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले. हे बंड होण्यापूर्वी पडद्यामागे काही दिवसांत बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडल्या. इतकंच नाही, तर अजित पवारांच्या बंडाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक दिवस आधीच कळलं होतं, अशी खळबळजनक माहिती समोर आलीये.

विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांनी सोडल्यानंतर शुक्रवारीच राष्ट्रवादीतील फुटीची स्क्रिप्ट प्रत्यक्षात तयार झाली होती. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र सुपूर्द केले. यामध्ये ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांना विधिमंडळ पक्षनेते (जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते आहेत) बदलून अजित पवार यांची नेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

अजित पवारांचा प्लान शरद पवारांना कळला अन्…

अजित पवार यांच्या समर्थक आमदारांच्या सह्याचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. पत्राच्या आधारे विधिमंडळ पक्षनेते या नात्याने अजित पवार यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपण शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. त्यानंतर शपथविधी सोहळ्याची लगबग सुरू झाली. याआधी शपथविधी सोहळा सोमवारी (3 जुलै) होणार होता, मात्र शरद पवारांना ही गुप्त चर्चा कळली आणि त्यामुळे रविवारी (2 जुलै) सकाळीच अजित पवारांसह इतर मंत्र्यांना शपथ देण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांचे मन वळविण्याचा झाला प्रयत्न

शपथ घेतलेल्या 9 नेत्यांसह राष्ट्रवादीचे 10 नेते दोन महिन्यांपासून शरद पवारांना भेटत होते आणि त्यांना सांगत होते की राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त आमदारांना भाजप-सेना सरकारमध्ये सामील व्हायचे आहे. आमदारांनीही पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारांनी ते मान्य केले नाही. त्यानंतर आमदारांनीच निर्णय घेतला. पवार या आघाडीसाठी तयार नसल्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा दबाव भाजपकडूनही अजित पवारांसह समर्थक नेत्यांवर होता.

ही आहेत कारणे

शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाणारे अजित पवार गेल्या काही काळापासून पक्षातच एकाकी पडत होते. सुप्रिया सुळे यांची सक्रियता वाढली होती आणि अजित एक प्रकारे बाजूला पडत चालले होते. अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, पण त्यांची राष्ट्रवादी पक्ष संघटनेवरील पकड जवळपास संपल्याचेच दिसत होते.अजित पवारांच्या नव्या खेळीने पक्षातील नाराजीशिवाय इतरही अनेक कारणे राष्ट्रवादीत फूट पडण्यामागे आहेत.

ADVERTISEMENT

वाचा >> NCP : अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती एप्रिलमध्येच?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर नजर टाकली तर चित्र स्पष्ट होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाची कमान अजित पवारांकडे जाणार की सुप्रिया सुळे यांच्याकडे या चर्चेला उधाण आले.

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर आले. अजित पवार यांनी यातून काहीही होणार नाही, असे सांगितले होते. शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत, असेही अजित पवार म्हणाले होते.

सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केले अन् असंतोष वाढला

दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात मुरब्बी राजकारणी असलेल्या शरद पवार यांनी दोन कार्याध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सुत्रे स्वतःकडे ठेवण्याची शर्यत थंडावली नाही.

राष्ट्रवादीच्या स्थापनादिनानिमित्त शरद पवार यांनी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याची घोषणा केली, त्यानंतर ठिणगी पडली. अजित पवार यांनी सुप्रिया यांना कार्याध्यक्ष बनवल्याबद्दल कोणतीही नाराज नसल्याचे सांगितले पण ते लपून राहिली नव्हती.

वाचा >> Ajit Pawar : भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी

शरद पवारांनंतर अजित पवार हे राष्ट्रवादीचे पुढचे अध्यक्ष मानले जात होते, पण पवारांनी सुप्रिया यांना कार्याध्यक्ष केले. आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवण्याचा पवारांचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक मानला जात होता. राष्ट्रवादीचे कार्याध्यक् तर दूरची गोष्ट मात्र अजित पवारांना पक्षातही कोणते पद नव्हते. शरद पवार ज्या प्रकारे कन्या सुप्रिया यांना राजकीयदृष्ट्या पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अजित पवार यांना त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल अनिश्चितता दिसत होती. त्या सगळ्या राजकीय अनिश्चिततातून अजित पवारांनी शेवटी भाजपसोबत संसार मांडण्याचा निर्णय घेतला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT