Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?
jantar mantar student protest : जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचं कव्हरेज करताना मुंबई Takच्या प्रतिनिधीला काही आंदोलकांनी घेरलं आणि घोषणाबाजी केली. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली आणि संबंधितांनी नंतर माफीही मागितली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?
jantar mantar student protest : नवी दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 25 दिवसांहून अधिक काळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज, मारहाण, अश्रूधुराचे नळकांडे आणि आंदोलकांसोबत झटापटी झाल्याच्या घटना घडल्या. या घडामोडीनंतरही जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच असून दररोज हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होत आहेत. मुंबई Takकडून या आंदोलनाचं सातत्याने कव्हरेज करण्यात येत असून गुरुवारीही प्रतिनिधी अनुजा धाक्रस आंदोलनस्थळी उपस्थित होत्या.
हेही वाचा : Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!
माध्यमांविरोधात घोषणाबाजी सुरू करत घेरण्याचा प्रयत्न
आंदोलनाचं कव्हरेज सुरू असताना अनुजा धाक्रस काही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेल्या. त्यावेळी काही जणांनी माध्यमांविरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अनुजा धाक्रस यांनी आपण प्रश्न विचारण्यासाठी आल्याचं वारंवार सांगत आंदोलकांना आधी प्रश्न ऐकून घेण्याची विनंती केली. पत्रकार म्हणून आपलं काम प्रश्न विचारणं आणि दोन्ही बाजू मांडणं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच एखाद्या पत्रकाराला प्रश्न न ऐकता घेरणं किंवा त्याच्यावर नाराजी व्यक्त करणं योग्य नसल्याचंही त्यांनी आंदोलकांच्या निदर्शनास आणून दिलं.
हेही वाचा : Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!
