मोठी बातमी! ‘या’ मतदारसंघात ईव्हीएमचं री-काऊंटिंग होणार, जागेवर गेम फिरणार? कोर्टाचा निकाल काय?

निलेश झालटे

मुंबईतल्या चांदिवली विधानसभा निवडणूक वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती आणि कोर्टानं त्यांचं म्हणणं ऐकून ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिलीये.

ADVERTISEMENT

EVM Recounting in Maharashtra
EVM Recounting in Maharashtra
google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी! ‘या’ मतदारसंघात ईव्हीएमचं री-काऊंटिंग होणार

point

जागेवर गेम फिरणार? कोर्टाचा निकाल काय?

EVM Recounting in Maharashtra : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएमचं री काऊंटिंग होणार आहे. ते महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय जो ऐतिहासिक मानला जातोय, ज्याची चर्चा होतेय. मुंबईतल्या चांदिवली विधानसभा निवडणूक वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती आणि कोर्टानं त्यांचं म्हणणं ऐकून ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिलीय. राहुल गांधींसह अनेक नेते सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित करत असताना आणि पत्रकार परिषदेतून डेमोसह हल्लाबोल करत असताना या निकालामुळे विरोधकांना मोठा दिलासा मिळालाय असंच म्हणावं लागेल. ही री काऊंटिंग कधी आणि कुठं होणार? नेमकी केस काय होती? कोर्टानं काय दिलाय दिलाय? आणि काय परिणाम होऊ शकतो याबाबतचे हे विश्लेषण.

नेमकी पार्श्वभूमी काय?

चांदिवली मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे आमदार आहेत दिलीप लांडे. सलग दोन वेळा म्हणजे २०१९ आणि २०२४ ला त्यांनी नसीम खान यांचा पराभव केलाय.  नसीम खान यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र २०१९ ला नसीम खान यांचा  ४०९ मतांनी निसटता पराभव झाला तर २४ला मात्र दिलीप लांडे यांनीच २०,६२५ मतांनी खान यांचा पराभव केला.  या निकालाविरोधात नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचे आरोप केले. न्यायालयाने त्यांचे मुद्दे लक्षात घेत  ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिलीय. ईव्हीएम उत्पादक कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविषयीचे पत्र मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नसीम खान यांना पाठवलंय.

खान यांनी लांडेंच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देत त्यांना अपात्र ठरवावे आणि स्वतःला विजयी घोषित करावे, अशी मागणी केली होती. कारण, मतमोजणीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. याचिकेत खान यांनी अनेक आरोप केले होते. त्यात मतदानाच्या दिवशी दुपारी 3.08 वाजता त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघाला दिलेल्या भेटीचाही उल्लेख होता. शिंदे हे शिवसेनेचे “स्टार प्रचारक” म्हणून नियुक्त होते आणि ही भेट कथितपणे प्रचार आणि रोड शोमध्ये परिवर्तित झाली, ज्यामुळे मतदारांवर परिणाम झाला, असा खान यांचा आरोप होता.

लांडेंनी कोर्टाला सांगितले की, 2019 मधील निवडणुकीतही खान यांनी याच कारणावरुन आव्हान दिले होते, तेव्हा त्यांना केवळ 409 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. फरक एवढाच की, त्यावेळी एकसंध शिवसेनेतून उमेदवारी असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता, अशी माहिती लांडे यांनी दिलेली. न्यायालयाने नुकतीच खान यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, EVMची तपासणी करण्याच्या त्यांच्या मागणीला मात्र न्यायालयाने मान्यता दिली. न्यायालयाने नमूद केले की, “EVMचे  रँडम परीक्षण करण्याची जी परवानगी यापूर्वीच दिली आहे, ती या निकालामुळे अडथळ्यात येणार नाही.

हे वाचलं का?