Maharashtra Political Crisis: बंडखोरी ते सेनेचा ताबा, शिंदेंनी कशी केली मात?
Maharashtra Political Crisis Chronology: मुंबई: राज्याच्या राजकारणात जून 2022 एक मोठी घडामोड घडली होती. ज्याचे परिणाम आजही महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळत आहे. जून महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) सुमारे 40 आमदारांसह महाराष्ट्रातून थेट सुरतमध्ये (Surat) जात उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) बंड पुकारलं. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. तेव्हापासून आजपर्यंत शिंदे […]
ADVERTISEMENT

Maharashtra Political Crisis Chronology: मुंबई: राज्याच्या राजकारणात जून 2022 एक मोठी घडामोड घडली होती. ज्याचे परिणाम आजही महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळत आहे. जून महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) सुमारे 40 आमदारांसह महाराष्ट्रातून थेट सुरतमध्ये (Surat) जात उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) बंड पुकारलं. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. तेव्हापासून आजपर्यंत शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) यांच्यातील संघर्ष हा सुरुच आहे. याच सत्तासंघर्षावर आपण टाकूयात एक नजर. (maharashtra political crisis rebellion to shiv senas takeover how is the exact battle of power struggle)
सत्तासंघर्षाची क्रोनोलॉजी समजून घ्या
20 जून 2022:
-
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह महाराष्ट्र सोडत थेट भाजपशासित गुजरात राज्यातील सुरत गाठलं
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. पण त्यावेळी शिवसेनेचे आणखी 10 ते 12 आमदार या बैठकीला गैरहजर होते.










