Raj Thackeray Maratha Morcha : ‘अरे व्वा! तुम्ही काय केलं असतं?’, राज ठाकरे फडणवीसांवर भडकले

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Raj Thackeray attacks on Devendra fadnavis over the incident of lathi charge on maratha reservation supporters.
Raj Thackeray attacks on Devendra fadnavis over the incident of lathi charge on maratha reservation supporters.
social share
google news

Maratha Reservation lathi charge Raj Thackeray news : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला. आंतरवला सराटी गावात पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या प्रकरणाने राजकारण तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला चढवला. यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना एक सल्लाही दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) आंतरवली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. चर्चा केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “मी आता मनोज जरांगे यांना सांगत होतो की, ज्या ज्या वेळी मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या त्या वेळी तुमच्यापर्यंत त्या चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या गेल्या. मोर्चे निघत होते, त्यावेळीच मी म्हणालो होतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हा सुप्रीम कोर्टामधील तिढा आहे.”

हेही वाचा >> Maratha Morcha : “हा जनरल डायर कोण?”, शिवसेनेचं (UBT) शिंदेंना चॅलेंज

आंदोलकांशी संवाद करताना राज ठाकरेंनी असंही सांगितलं की, “आपण काही गोष्टी कायद्याने समजून घ्या. परंतु हे सतत तुम्हाला आरक्षणाचं आमिष दाखवून कधीही हे सत्तेमध्ये, कधी ते विरोधी पक्षामध्ये. विरोधी पक्षात असताना मोर्चे काढणार आणि सत्तेत आले की, गोळ्या झाडणार. सत्तेत आल्यावर तुम्हाला तुडवणार. हेच जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा यांना तुमच्याबद्दल प्रेम आलेलं असतं. सत्तेत गेल्यानंतर हे सगळे मारायला उठतात.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांना लाठीमाराचे आदेश कुणी दिलेत?

“मी मनोज जरांगेंना तेच सांगत होतो की, पोलिसांना दोष देऊ नका. आदेश कुणी दिलेत? ज्यांनी पोलिसांना आदेश दिलेत, त्यांना दोष द्या. पोलीस काय करणार, ते तुमच्या आमच्यातीलच आहेत. जे वरून सांगितलं गेलं, ती गोष्ट त्यांना करावीच लागणार”, असे म्हणत राज ठाकरेंनी गृहमंत्र्यालयाला यासाठी जबाबदार धरलं आहे.

Raj Thackeray : “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होऊ शकत नाही”

“मी मागेही सांगितलं होतं की, अरबी समुद्रात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा. एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडे मते मागितली गेली. समुद्रात जाऊन फुले टाकली. 2007-08 ला हा विषय आला होता. तेव्हापासून मी सांगतोय की, हा पुतळा होऊ शकत नाही. एवढा मोठा पुतळा समुद्रात उभा करणे अशक्य गोष्ट आहे. तेव्हा मी म्हणालो होतो की, महाराजांचं स्मारक हे गडकिल्ले आहेत. हे गडकिल्ले सुधारणले पाहिजे. पुढच्या पिढ्यांना सांगितलं पाहिजे की, होऊन गेलेला आमचा राजा कोण होता”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

यांना प्रवेश बंद करा -राज ठाकरे

“हे सतत तुमच्यासमोर आरक्षण, पुतळे यांचं राजकारण करतात. तुमची मतं पदरात पाडून घेतात. मतं मिळाली की, तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतात. मी तुमच्यासमोर भाषण करायला आलेलो नाही. मी विनंती करायला आलोय की, ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसवल्या, ज्यांनी पोलिसांना तुम्हाला गोळ्या मारायला लावल्या. त्या सर्व लोकांना तुम्ही मराठवाडा बंदी करून टाका. जोपर्यंत ते माफी मागत नाही”, असे आवाहन राज ठाकरे यांनी आंदोलकांना केले.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंचे खडेबोल

यावेळी राज ठाकरे म्हणाले, “मी ऐकलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, झालेल्या गोष्टीचं कुणी राजकारण करू नये. अरे व्वा! हे जर विरोधी पक्षात असते, तर यांनी काय केलं असतं? हेच केलं असतं ना राजकारण. मी राजकारण करायला आलेलो नाहीये. मी ते व्हिडीओ बघितले. ते पाहिल्यानंतर मला बघवलं नाही. माझ्या माताभगिनींवर लाठ्या बरसवल्या गेल्या”, असे टीकास्त्र ठाकरेंनी फडणवीसांवर डागलं.

“मला मनोज जरांगे यांनी काही विषय सांगितले आहेत. मी मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) भेट घेऊन त्यांच्या कानावर घालेन. त्यातून काय आणि कसा मार्ग निघतोय, हे मला आताच सांगता येणार नाही. मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला आमिष दाखवणार नाही. विषय सुटण्यासारखा असेल, तर निश्चित सोडवू”, असे आश्वासन राज ठाकरेंनी आंदोलकांना दिले.

हेही वाचा >> Mumbai Crime News : एअर होस्टेस तरुणीची हत्या, पवईतील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

“आता मी या लोकांना सांगितलं की, या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका. त्यांच्यासाठी एक जण गेला तरी फरक पडत नाही. पण, आपल्यासाठी एकजण महत्त्वाचा आहे. परत या लोकांच्या कधी नादी लागू नका. निवडणुका येतील, तेव्हा हे अशाच गोष्टी तुमच्यासमोर मांडतील. तेव्हा फक्त हे काठीचे वळ लक्षात ठेवा”, असा सल्ला राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना दिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT