मनोजदादांनी फक्त आदेश द्यावा..मुंबईला जाऊ; महिलांचा सरकारला थेट इशारा

मुंबई तक

maratha protest : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस असून प्रकृती खालावत असल्याने अंतरवाली सराटीत महिला आंदोलक भावूक झाल्या. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाण्यासाठी तयार असल्याचा इशारा महिलांनी सरकारला दिला आहे.

ADVERTISEMENT

maratha protest
maratha protest
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे दादांनी फक्त आदेश द्यावा..मुंबईला जाऊ

point

महिलांचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Patil hunger strike : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र आणि भावनिक होताना दिसत आहे. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी (दि.6) नववा दिवस होता. गेल्या नऊ दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली आहे. त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजातील महिला भावूक झाल्या. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले.

हेही वाचा : कराड: दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध, साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडला संपवलं

“आमच्या दादांची एवढी कसोटी कोणीच बघू नये”

पिंपळवंडी येथून आलेल्या एका महिला आंदोलकाने भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आमच्या सगळ्या बहिणींचं आयुष्य कमी हो आणि आमच्या भावाला भेटो,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. जरांगे पाटील यांची प्रकृती पाहवत नसल्याचं सांगत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. “आमच्या दादांची एवढी कसोटी कोणीच बघू नये,” असं म्हणत त्यांनी सरकारला लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलं. नऊ दिवस उपाशी राहणं ही साधी गोष्ट नसल्याचं सांगत त्यांनी सरकारने दुर्लक्ष केल्यास महिला आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही दिला.

हेही वाचा : नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्याने संपवलं जीवन, सुसाईड नोेटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे