Maratha Reservation: 'त्या' मागण्या मान्य अन् जरांगेंनी उपोषण सोडलं, मराठा तरूणांना दिला 'हा' आदेश!
Maratha Reservation High Court Hearing: मुंबईतील आझाद मैदान आणि परिसर हा आज (2 सप्टेंबर) 3 वाजतेपर्यंत मोकळा करण्यात यावा असे आदेश हायकोर्टाने दिले होते. ज्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. पाहा सुनावणीत नेमकं काय घडतंय.
ADVERTISEMENT

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात जे आंदोलन पुकारण्यात आलं ते बेकायदेशीर आहे. अशी टिप्पणी हायकोर्टाने केली होती.ज्यानंतर कोर्टाने सरकारला आज (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई मोकळी करावी असे आदेश दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी सुरू झाली. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जी उपसमिती नेमण्यात आली होती त्या समितेने जो मसुदा तयार केला होता तो मनोज जरांगे यांना पहिल्याच चर्चेत मान्य झाला. तसंच याबाबत तीन जीआर काढण्यात यावे असंही ठरलं. त्यानंतर पहिला जीआर सरकारने जारी केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं.
मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेत मनोज जरांगे यांनी मुंबईतील आपलं आमरण उपोषण सोडलं. त्याचवेळी त्यांनी सर्व मराठा आंदोलकांना मुंबई सोडून आपआपल्या गावी परतण्यासही सांगितलं.
जरांगेंनी उपोषण सोडण्याआधी नेमकं काय-काय घडलेलं?
एकीकडे हायकोर्टात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारने जी उपसमिती गठीत केली आहे त्यातील सदस्य हे आता आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत.