Lok Sabha 2024 : “पृथ्वीराज चव्हाण धडधडीत खोटं बोलताहेत “, ‘वंचित’ भडकली
“प्रकाश आंबेडकर किंवा राजू शेट्टींनी उमेदवार उभे केले तर फायदा आणि तोटा कुणाला होणार हे स्पष्ट आहे, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यावर वंचित आघाडीने काय म्हटलंय?
ADVERTISEMENT

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing : “प्रकाश आंबेडकर किंवा राजू शेट्टींनी उमेदवार उभे केले तर फायदा आणि तोटा कुणाला होणार हे स्पष्ट आहे, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दलच पृथ्वीराज चव्हाणांनी शंका घेतल्याने वंचित बहुजन आघाडी भडकली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, “काँग्रेसचे बंडखोर नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर गरळ ओकली आहे. पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय करू पाहत आहेत, काय घडवू पाहत आहेत, याबद्दलच आता आम्हाला शंका येऊ लागली आहे”, असे वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी लिहिलं होतं पत्र
ते पुढे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला तीन पत्र लिहिली गेली. १ सप्टेंबर २०२३ रोजी लिहिलेलं पत्र हे आमच्या प्रवक्त्याने लिहिलेलं पत्र होतं. त्यानंतर राहुल गांधींना २५ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या संविधान सन्मान सभेसाठीचं पत्र बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं होतं. राज्य कार्यकारिणीने चार पक्षात समसमान जागावाटप करावं, हा प्रत्येकी १२ जागांचा फॉर्म्युला मांडला.”
हेही वाचा >> “…तर हा प्रसंग आला नसता”, नार्वेकरांचा संताप; ठाकरेंना सुनावलं
“त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने पुन्हा एक पत्र मल्लिकार्जून खरगे यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून दोन वेळा त्यांच्या पक्षाला पत्र गेलेलं असताना, ती पत्र समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध असताना पृथ्वीराज चव्हाण धडधडीत खोटं बोलताहेत की, वंचित बहुजन आघाडीच्या फक्त प्रवक्त्यांनी पत्र लिहिलं. पृथ्वाराज चव्हाणांचा हा राजकीय आंधळेपणा कशाने दूर होईल, मला माहिती नाही. भाजपकडून त्यांचे टेस्टिंग सुरू आहे का?”, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे.










