Bhajanlal Sharma : भाजपला का हवा होता ब्राह्मण चेहरा? मुख्यमंत्री निवडीची Inside Story

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Why was Bhajan Lal elected in Rajasthan?
Why was Bhajan Lal elected in Rajasthan?
social share
google news

Bhajanlal Sharma Rajasthan New CM : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील मुख्यमंत्री निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्यानंतर भाजप आमदार भजनलाल शर्मा हे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या हातात एक चिठ्ठी दिली गेली. त्या चिठ्ठीत काय लिहिले होते, हे शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्सच राहिले. त्यातील माहिती कुणालाही कळली नाही. चिठ्ठी वसुंधरा राजेंच्या हातात दिली गेली, पण चिठ्ठीत नाव भजनलाल शर्मा यांचे होते. पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांना राजस्थानचे मुख्यमंत्री केले गेले. त्यामुळे भाजपने हा निर्णय का घेतला, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (why BJP was looking for a Brahmin face in Rajasthan)

3 डिसेंबर रोजी राजस्थानचा निकाल जितका लक्ष वेधून घेणारा होता, तसंच काहीसं घडलं 12 तारखेला राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवेळी. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसलेले पहिल्या वेळी आमदार झालेले भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले जाणार गेले. कार्यकर्त्यांप्रमाणे शेवटच्या रांगेत उभे असलेले आमदार भजनलाल शर्मा मुख्यमंत्री बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपने धक्के देण्याची केली हॅट्ट्रिक

छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांना बाजूला करून विष्णू देव साय यांना मुख्यमंत्री बनवण्याचे जे धक्कातंत्र सुरू झाले, ते शिव’राज’ संपवून मोहन यादव यांना पुढे करत मध्य प्रदेशात सुरू राहिले. त्यानंतर मंगळवारी वसुंधरा राजे यांना अलगद बाजूला ठेवून भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करत भाजपने आश्चर्याचे धक्के देण्याची हॅट्ट्रिक साधली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजस्थानमध्ये भजनलाल शर्मांना का निवडले?

भजनलाल शर्मा यांना निवडून आणून भाजपने केवळ राजस्थानमध्ये नव्या नेतृत्वाला वाट करून दिली आहे, असे समजणे मर्यादित होईल. कारण असं म्हटलं जात आहे की, भाजपने राजस्थानातून भजनलाल यांच्या माध्यमातून जो डाव टाकला आहे, तो फक्त राजस्थानपुरताच मर्यादित राहणार नाही.

हेही वाचा >> Article 370: …तर मुंबईही बनू शकतो केंद्रशासित प्रदेश!

– भजनलाल शर्मा हे ब्राह्मण आहेत.

ADVERTISEMENT

– हरिदेव जोशी हे 1990 मध्ये राजस्थानचे शेवटचे ब्राह्मण मुख्यमंत्री होते.

ADVERTISEMENT

– राजस्थानमध्ये भाजपने 33 वर्षांनंतर पुन्हा एका ब्राह्मण चेहऱ्याला मुख्यमंत्री केले आहे.

– राजस्थान हे उत्तर भारतातील पहिले राज्य आहे जेथे ब्राह्मण मुख्यमंत्री असेल.

– उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये ब्राह्मण चेहरे मुख्यमंत्री नाही, तर उपमुख्यमंत्री झाले.

हेही वाचा >> शिवराज सिंह चौहान यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडल्या महिला, नेमकं काय घडलं?

राजस्थानात ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री करून भाजपने जो एक समज तयार होत होता की, आता ब्राह्मण नेतृत्वाला उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावं लागेल, त्याला तडा दिला.

आता ब्राह्मण मतांचं समीकरण समजून घ्या. उत्तर भारताबाबत बोलायचे झाले तर एकट्या राजस्थानमध्ये 8 टक्के ब्राह्मण आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 10 ते 12 टक्के ब्राह्मण मते आहेत. हिमाचल प्रदेशात 18 टक्के, मध्य प्रदेशात 6 टक्के, बिहारमध्ये 4 टक्के मते आहेत.

राजस्थानमध्ये ब्राह्मण मताचा अर्थ काय?

ब्राह्मण मतदार इतर लोकसंख्येपेक्षा अधिक प्रभावीपणे मतदान करतो. मग ब्राह्मण असलेल्या भजनलाल शर्मा यांच्या माध्यमातून टाकलेल्या डावाने वर्तुळ पूर्ण झाले आहे का? ज्याची सुरुवात छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री करून झाली. मग मध्य प्रदेशात ओबीसी चेहरा निवडून राजस्थानमध्ये ब्राह्मण भजनलाल यांच्या माध्यमातून ते वर्तुळ पूर्ण केले गेले.

भाजप का शोधत होती ब्राह्मण नेतृत्व?

छत्तीसगडमध्ये आदिवासी समूहातील आणि मध्य प्रदेशात ओबासी चेहरा मुख्यमंत्रिपदी बसवल्यानंतर ब्राह्मण चेहऱ्याचा शोध सुरू झाला. चार दिवसांपूर्वीच दिल्लीत बैठक बोलावण्यात आली. ज्यामध्ये ब्राह्मण चेहरा म्हणून भजनलाल शर्मांची निवड करण्यात आली. याशिवाय राजस्थान सरकारमध्ये प्रेमचंद बैरवा, दिया कुमारी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.

फक्त भजनलालच का? ब्राह्मण कार्ड हेच कारण आहे का?

भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा झाली, त्यावेळी व्यासपीठावर वसुंधरा राजे उपस्थित होत्या. वसुंधरा राजे ज्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पहिल्यांदा जयपूरला आले आणि सुमारे 10 ते 15 मिनिटे भेटले आणि त्यानंतर राजनाथ सिंह हे वसुंधरा राजे यांच्यासोबत भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी पोहोचले. त्यानंतर चिठ्ठीमध्ये भजनलाल यांचे नाव वसुंधरा राजे यांना दिसते. राजस्थानच्या बदललेल्या राजकारणाचा हा एक अध्याय आहे.

हेही वाचा >> ‘आमचा शिवसेना बाळासाहेब वेगळा गट असेल’, केसरकरांनी सुनावणीत काय सांगितलं?

पक्ष संघटनेसाठी काम

राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वीही भजनलाल शर्मा मंचाची जबाबदारी सांभाळत होते. अध्यक्ष कोणीही असो, ते स्टेज सांभाळत असे. त्यांनीच राज्यातील नेत्यांना बोलावले. कोरोनामध्ये काँग्रेसचा पर्दाफाश केला होता. तेव्हापासून भजनलाल प्रसिद्धीच्या झोतात आले होते. अमित शाहांना ते आवडले, आता इतर आमदारांनाही ते आवडले पाहिजे.

भजनलाल शर्मा यांचे नाव का?

राजस्थानमध्ये आत्तापर्यंत भाजपमध्ये जो कोणी पुढे आला त्याचा वसुंधरा राजे यांच्याशी काही ना काही संबंध असल्याचे बोलले जाते. अशावेळी भाजप भजनलाल शर्मा यांच्यासारख्या नेत्याच्या शोधात होती. शोध नवीन विचार करणाऱ्या व्यक्तीचा होता. नवीन पद्धतीने काम करणाऱ्या, मग भजनलाल शर्मा हे पक्ष, संघटना आणि संघाचा पर्याय बनले.

2024 पूर्वी नवीन टीम तयार

2024 पूर्वी भाजपने नवी टीम तयार करून जातीय समीकरण तयार केले आहे. ब्राह्मण भाजपला मतदान करत आले आहेत. कोणताही मुख्यमंत्री ब्राह्मण नव्हता. मुख्यमंत्रीपदी अमित शाहा यांची संमती असलेला चेहरा निवडून संदेश दिला गेला आहे. राजस्थानात ब्राह्मण निर्विवाद आहेत आणि इतर जातींमध्ये विरोध नाही. राजस्थानमध्ये एखादा राजपूत सीएम झाला तर जाट संतापतात असं म्हटलं जातं. ब्राह्मण भजनलाल शर्मांमुळे नाराजीची लाट दूर झाली. सोबतच बैरवा आणि दिया कुमारी असे कॉम्बो समीकरण आले. हा भाजपचा दुसरा डाव ठरला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT