छत्रपती संभाजीनगरची दंगल फडणवीसांनी घडवून आणली? शरद पवार म्हणाले…
छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीची घटना घडली. यात देवेंद्र फडणवीसांवर राजकीय वर्तुळातून आरोप करण्यात आले. यावर आता शरद पवारांनी भाष्य केले.
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमीच्या आधी मध्यरात्री (30 मार्च) दोन गट आमने सामने येऊन दंगल घडली. शहरातील किराडपुरा भागात झालेल्या या हिंसाचाराच्या प्रकरणावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी राजकीय नेत्यांचे कान टोचत या घटनेवर भूमिका मांडली. (Sharad Pawar first reaction on Chhatrapati Sambhaji Nagar violence, say’s political leaders should speak responsibly)
नागपूरमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ‘महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणली आहे, असाही आरोप झाला. त्यावर तुमचं भाष्य काय?’, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.
काही लोकांनी राजकीय मते व्यक्त केली -शरद पवार
त्यावर ते म्हणाले, “मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण, महाराष्ट्रात अलिकडच्या काळात औरंगाबादला काही प्रकार घडला आणि मुंबईमध्ये मालवणी परिसरात एक प्रसंग घडला. या दोन्ही ठिकाणी त्याला एक प्रकारचे धार्मिक स्वरूप आहे की, काय अशी चिंता वाटण्याची स्थिती होती. त्याच्यामध्ये काही लोकांनी एकमेकांच्या संबंधी राजकीय मते व्यक्त केलेली आहेत, हे माझ्या वाचण्यात आले. पाहण्यात आले.”
Video : ‘मी आहे तोवर राम मंदिराला काही होऊ देणार नाही’, इम्तियाज जलील यांचा मंदिरातून मेसेज
“माझं स्पष्ट मत हे आहे की, या सगळ्या गोष्टींच्या संबंधी अधिक चर्चा करणे योग्य नाही. लवकरात लवकर पूर्वपरिस्थिती आता निर्माण झालेली आहे. ती स्थिती टिकेल कशी, हे बघितले पाहिजे”, अशी भूमिक शरद पवार यांनी यावेळी मांडली.










