मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा होणार महापौर, 44 वर्षांपूर्वीचा इतिहास घ्या जाणून

मुंबई तक

Mumbai Mayor : मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार अशा चर्चा सुरु आहेत. मात्र या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आलीय. ज्याचा जवळपास सगळयांनाच विसर पडलाय. ते म्हणजे मुंबईत या पूर्वीही भाजपचा महापौर होता. त्यामुळे आता भाजपचा महापौर झाला तर पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा मुंबईत भाजपचा महापौर असेल.

ADVERTISEMENT

Mumbai Mayor
Mumbai Mayor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तत्कालीन परिस्थितीत महापौर 5 वर्षांसाठी...

point

काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच गंभीर आव्हान

point

भाजपचा पहिला महापौर कोण? 

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौर पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र, भाजपचे 89 उमेदवार निवडून आलेत त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असा दावा केला जातोय. तर, माध्यमांमध्ये मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार अशा चर्चा सुरु आहेत. मात्र या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आलीय. ज्याचा जवळपास सगळयांनाच विसर पडलाय. ते म्हणजे मुंबईत या पूर्वीही भाजपचा महापौर होता. त्यामुळे आता भाजपचा महापौर झाला तर पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा मुंबईत भाजपचा महापौर असेल. साधारण 1982ची गोष्ट आहे जेव्हा डॉ. प्रभाकर संजीव पै हे मुंबईचे महापौर झाले होते. त्यामुळे डॉ. प्रभाकर संजीव पै नेमके कोण होते? त्यावेळेसची राजकीय स्थिती काय होती? समीकरणं काय होती? याबाबतची माहिती समजून घेऊयात. 

हे ही वाचा :  'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला

1977 च्या काळात जनसंघ+समाजवादी आणि लोकदल हे मिळून जनता पार्टी होती. मात्र 1979-80 पर्यंत जनता पार्टीत संघर्ष सुरु झाला. नेते आपल्या आपल्या वाटेने वेगळे झाले. आणि 1980 मध्ये जनता पार्टीतून विभक्त होवून भाजपची स्थापना झाली. 1980 च्या या काळात महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष प्रभावी होता. स्थानिक स्वराज्य संस्थांवरही कॉंग्रेसचंच वर्चस्व होतं. 

तत्कालीन परिस्थितीत महापौर एकच वर्षांसाठी...

पुढे 1982 मध्ये 140 जागांसाठी महापालिका निवडणूक झाली होती. बहुमतासाठी 71 जागा आवश्यक होत्या. मात्र, काँग्रेस, शिवसेना, भाजप, डावे / समाजवादी किंवा काँग्रेसविरोधी अपक्ष यातल्या कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. नुकताच स्वतंत्र झालेला भाजप पक्ष तेव्हा लहान पक्ष होता. भाजपचे 19 नगरसेवक तेव्हा निवडून आले होते. मात्र, हा तो काळ होता जेव्हा महापौरपद व्यक्ति किंवा पक्षावर नाही तर आघाड्यांवर ठरायचं. आता महापौर पद 5 वर्षांसाठी असंत मात्र तेव्हा एकच वर्ष महापौर असायचा. 

काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच गंभीर आव्हान

घडलं असं की, बहुमत नसल्यामुळे काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच गंभीर आव्हान मिळालं.  शिवसेना + भाजप / जनसंघ विचारसरणीचे नगरसेवक + अपक्ष + आणि काही समाजवाद्यांनी मिळून काँग्रेसविरोधी आघाडी केली. बहुमताचा आकडा गाठला. नगरसेवकांमधून मतदान झालं. आणि डॉ. प्रभाकर डॉ. प्रभाकर पै यांची निवड झाली. डॉ. प्रभाकर पै काँग्रेसचे नव्हते आणि जनसंघ–जनता परंपरेशी त्यांची जवळीक होती या मेन मुद्द्यांवर मुंबईचे भाजपचे पहिले महापौर म्हणून डॉ. प्रभाकर पै यांची निवड झाली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp