Shiv Sena UBT : "शिंदे-मिंधे गटाचे शेपूट अखेर भाजपच्या अजगराने गिळले"

मुंबई तक

Shiv Sena UBT, Lok Sabha election 2024 Mahayuti Seats Sharing : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखातून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध शिवसेना (एकनाथ शिंदे)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना संपवण्याचे भाजपचे स्वप्न होते -ठाकरे गट

point

महायुतीत शिंदेंच्या सेनेच्या हक्काच्या जागा गेल्याचा मुद्दा

point

ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखात काय काय म्हटलंय?

Uddhav Thackeray's Shiv Sena : "आम्हीच खरी शिवसेना असा बोभाटा करणाऱ्या शिंदे-मिंधे गटाचे शेपूट अखेर भाजपच्या अजगराने गिळले आहे. मिंधे गटाकडे धड नव्हतेच. शेपूटच वळवळ करीत होते. ते शेपूटही अखेर संपले. भाजप म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे आता या चोर मंडळास कळले आहे", अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेनेवर तोफ डागली आहे. एकनाथ शिंदेंच्या विद्ममान खासदारांची तिकिटं भाजपच्या दबावामुळे कापण्यात आल्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केले. (Shiv Sena Led by Uddhav Thackeray has been attacked on Eknath Shinde's Shiv Sena)

महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोजक्याच जागा मिळताना दिसत आहे. त्यातही शिंदेंसोबत गेलेल्या काही खासदारांची तिकिटं कापण्यात आली. तर एका खासदाराची नाव घोषित केल्यानंतर उमेदवारी बदलण्यात आली. या सगळ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपवर आगपाखड केली आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर पक्षपाती केल्याचा आरोप केला आहे. अग्रलेखात म्हटलंय की, "निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी बेइमानी करून गद्दार गटाच्या हाती शिवसेना व धनुष्यबाण सोपवला. त्यामुळे गद्दारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सत्य हे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचा डाव भाजपने पूर्णत्वास नेला हे आता स्पष्ट दिसते."

सामना अग्रलेखात काय? महत्त्वाचे 9 मुद्दे 

1) "मूळ शिवसेना (मिंध्यांचा फुटीर गट नाही) राज्यांत 23 लोकसभा मतदारसंघांत धनुष्यबाणावर निवडणुका लढत असे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात धनुष्यबाणाचाच बोलबाला होता, पण मिंधे गटास अर्ध्या जागाही मिळत नाहीत. ज्या आहेत त्यातील चार-पाच जागा गिळून भाजपने त्या-त्या भागातून धनुष्यबाणच गायब केला."

हे वाचलं का?

    follow whatsapp