देवेंद्र फडणवीस: “फॉक्सकॉनसाठी ज्यांनी काहीच केलं नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत”

मुंबई तक

महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रात पहिला क्रमांक होता. मागच्या दोन वर्षात आपण पहिल्या क्रमांकावरून पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेलो. गुजरातला नावं ठेवून आणि त्यांच्या विरोधात भाषणं करून आपण पहिल्या क्रमांकावर जाणार नाही. त्यासाठी तशी धोरणं असावी लागतात असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर फॉक्सकॉन महाराष्ट्रात राहवा म्हणून ज्यांनी काहीही प्रयत्न केले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रात पहिला क्रमांक होता. मागच्या दोन वर्षात आपण पहिल्या क्रमांकावरून पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेलो. गुजरातला नावं ठेवून आणि त्यांच्या विरोधात भाषणं करून आपण पहिल्या क्रमांकावर जाणार नाही. त्यासाठी तशी धोरणं असावी लागतात असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर फॉक्सकॉन महाराष्ट्रात राहवा म्हणून ज्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत ते आम्हाला शिकवत आहेत असंही फडणवीस म्हणाले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन वातावरण तापलं, राष्ट्रवादी- शिवसेना उतरली रस्त्यावर

देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत.

प्रकल्प गुजरातला न्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळातलाच

आपण चांगलं पॅकेज त्यांना ऑफर केलं होतं. मात्र शेवटी त्यांनी मला सांगितलं की आमचा हा निर्णय झाला आहे. मात्र पुढची सगळी गुंतवणूक यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात केला. आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. ज्यांनी काहीच केलं नाही ते आम्हाला आता शहाणपणा शिकवत आहेत. आम्ही प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून आम्ही निकराचे प्रयत्न केले. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेऊन दाखवणार अशीही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp