लोकसभा अध्यक्ष बिर्लांच्या निर्णयाला शिवसेनेचं सुप्रीम कोर्टात आव्हान; याचिकेत गंभीर मुद्दे

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या घटनात्मक पेचांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. एकीकडे शिवसेनेतील वाद वाढताना दिसत असून, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची संख्याही वाढू लागली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या घटनात्मक पेचांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. एकीकडे शिवसेनेतील वाद वाढताना दिसत असून, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची संख्याही वाढू लागली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे.

शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे गटनेते म्हणून खासदार राहुल शेवाळे यांची, तर प्रतोद म्हणून खासदार भावना गवळी यांची नियुक्ती करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली होती.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेनेच्या गटनेते खासदार विनायक राऊत आणि प्रतोद खासदार राजन विचारे यांची नियुक्ती रद्द करत राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांच्या नियुक्तीला परवानगी दिली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या या निर्णयालाच आता शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि खासदार राजन विचारे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी मनमानी पद्धतीने आणि एकतर्फी निर्णय घेत लोकसभा गटनेतेपदावरून आणि प्रतोदपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp