‘ऋषी सुनकांच्या पंतप्रधानपदाचं श्रेय शिंदे-फडणवीसांना’; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना चिमटा

मुंबई तक

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जगातील ३३ देशांनी आपल्या बंडाची नोंद घेतल्याचा पुनरुच्चार सातत्यानं करताहेत. शिंदेंच्या याच विधानावरून आता सामनातून चिमटे काढण्यात आलेत. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदेंबरोबर फडणवीसांवरही निशाणा साधण्यात आलाय. सामना अग्रलेखात म्हटलंय की, ‘महाराष्ट्रातील राजकीय ‘सामना’ मिंधे गटाने म्हणे तीन महिन्यांपूर्वी जिंकला. पुन्हा सामना अद्यापि सुरूच असल्याने या दिवाळीत वेगवेगळ्या तलावांवर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जगातील ३३ देशांनी आपल्या बंडाची नोंद घेतल्याचा पुनरुच्चार सातत्यानं करताहेत. शिंदेंच्या याच विधानावरून आता सामनातून चिमटे काढण्यात आलेत. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदेंबरोबर फडणवीसांवरही निशाणा साधण्यात आलाय.

सामना अग्रलेखात म्हटलंय की, ‘महाराष्ट्रातील राजकीय ‘सामना’ मिंधे गटाने म्हणे तीन महिन्यांपूर्वी जिंकला. पुन्हा सामना अद्यापि सुरूच असल्याने या दिवाळीत वेगवेगळ्या तलावांवर भल्या पहाटेच ‘सोन्याचा धूर’ निघाला. द्वारका जशी श्रीकृष्णामुळे एका क्षणात सोन्याची झाली, तशी महाराष्ट्रातही लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली. मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले.”

सामनात ‘चाळीस खोकेबाज आमदार’ उल्लेख

“मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकला आहे. त्यामुळे शिधा कशाला घ्यायचा, आपण सराफ बाजार आणि शेअर बाजारात जाऊ. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल झाले. मिंधे गटाच्या चाळीस खोकेबाज आमदारांमुळे सोन्याचा बाजार आणि शेअर बाजारही वधारला. हे सर्व शक्य झाले ते तीन महिन्यांपूर्वी मिंधे गटाने सामना जिंकल्यामुळेच”, असंही सामना अग्रलेखात म्हटलंय.

“भारताच्या विजयाचं श्रेय मिंधे-फडणवीसांना”, सामनात काय म्हटलंय?

“ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाक क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम धुवाधार फटकेबाजी केली. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला, पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते, तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिंकले याचे संपूर्ण श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल”, असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला ठाकरेंनी लगावला.

हे वाचलं का?

    follow whatsapp