महाराष्ट्र सत्तासंघर्ष: राज्यपालांची भूमिका चिंताजनक; कोर्टाचे खडे सवाल

मुंबई तक

Supreme court Hearing : नवी दिल्ली: बुधवारी सुप्रीम कोर्टात खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाकडून अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या. सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित झाला की, निर्णय झाला नसता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते? महाराष्ट्रात सत्ता संघर्ष होत असताना राज्यपालांनी (Maharashtra Governor) आपल्या अधिकारांचा योग्य वापर केला नाही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Supreme court Hearing : नवी दिल्ली: बुधवारी सुप्रीम कोर्टात खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाकडून अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या. सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित झाला की, निर्णय झाला नसता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते? महाराष्ट्रात सत्ता संघर्ष होत असताना राज्यपालांनी (Maharashtra Governor) आपल्या अधिकारांचा योग्य वापर केला नाही का? महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तेच्या सर्वात मोठ्या राजकीय संकटाच्या वेळी राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती का? (‘Was the Governor’s role questionable?’, asked the Supreme Court)

महाराष्ट्रातील सत्ता उलथापालथ दरम्यान राज्यपालांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यास सांगणे चुकीचे होते का? महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंकडून शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जात असताना राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा वापर जपून केला नाही का? सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हे काही प्रश्न समोर आले.

खरे तर महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेच्या विरोधात शिंदे गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सभागृहात विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यास सांगितले होते. यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरी शिवसेना कोण या वादात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान राज्यपाल असलेल्या कोश्यारींवर अत्यंत कठोर टीका केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायम वादातच का अडकतात? वाचा सविस्तर

हे वाचलं का?

    follow whatsapp