Vidhan Parishad Election : पाचही उमेदवार विजयी, राज्यात ही परिवर्तनाची नांदी-फडणवीस
विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी […]
ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
माझे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताई टिळक हे दोघेही अडचणीत असून, आजारी असून या ठिकाणी आले त्यांचे मी विशेष मी आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीतल्या विजयामुळे परिवर्तानाची नांदी आता पाहण्यास मिळते आहे. सरकारच्या विरोधातला असंतोष समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘शतरंज का बादशाह’, रावसाहेब दानवेंनी केलं कौतुक
महाविकास आघाडीविरोधात आम्हाला चांगली मतं मिळाली. १३४ मतं आम्हाला मिळाली आहेत. आमचे पाचही उमेदवार सर्वाधिक मतं मिळवून निवडून आले आहेत. देशात मोदींची लाट आहे आणि महाराष्ट्रही मोदींच्या मागे उभा आहे हेच या निकालांनी दाखवून दिलं आहे.