PM Modi म्हणाल्याप्रमाणे वीर सावरकर तुरूंगात असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायचे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. यावेळी मोदींनी भाषणही केलं, पण भाषणातील एका मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले गेले. संत तुकाराम महाराजांबद्दल गौरवोद्गगार काढतानाच वीर सावरकर तुरूंगात असताना तुकोबारायांच्या अभंग म्हणायचं असं पंतप्रधानांनी म्हटलं. पंतप्रधानांच्या विधानांवरून चर्चा सुरू झाली आहे. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? ”संत हे आपल्यात असलेल्या […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. यावेळी मोदींनी भाषणही केलं, पण भाषणातील एका मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले गेले. संत तुकाराम महाराजांबद्दल गौरवोद्गगार काढतानाच वीर सावरकर तुरूंगात असताना तुकोबारायांच्या अभंग म्हणायचं असं पंतप्रधानांनी म्हटलं. पंतप्रधानांच्या विधानांवरून चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
”संत हे आपल्यात असलेल्या उर्जेचा स्रोत असतात. ते विविध परिस्थितींमध्ये समाजाला गती देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांचं मोठं स्थान आहे. एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी हातातल्या बेड्या ते चिपळ्यांप्रमाणे वाजवत आणि तुकारामांचे अभंग गात असत”